सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

लिंगसा येथे अहिल्याबाई होळकर जयंती उत्साहात साजरी..


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
परतूर तालुक्यातील लिंगसा येथे अखंड भारताचे वैभव वाढवणाऱ्या भारतीय संस्कृतीची विचारधारा जोपासताना संपूर्ण आयुष्य राष्ट्रासाठी समर्पित करणाऱ्या राजमाता राष्ट्रमाताअहिल्याबाई होळकर यांची 297 जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी अनेक मान्यवर उपस्थित होते प्रतिमा पूजन करून भव्य मिरवणूक काढण्यात आली अहिल्याबाई होळकर यांच्या विचारांचा जागर करण्यात आला आजच्या महिलांनी व युवा तरुणांनी अहिल्याबाई होळकरांचा विचारांचा आदर्श समोर ठेवला पाहिजे अहिल्याबाई होळकरांनी. त्याग, शौर्य ,पराक्रम, खूप महान आहे.अनेक मंदिरे, घाट, धर्मशाळा, पानपोई,बारव, यांचे बांधकाम केले. अहिल्याबाई होळकर यांचे कार्य फार महान आहे असे प्रतिपादन कु. सुनिता गायकवाड यांनी केले आहे. तसेच अहिल्याबाई होळकर यांचा त्याग, पराक्रम ,व विचार आपण आत्मसात केला पाहिजे आपण जीवन जगत असताना अहिल्याबाई होळकरांच्या जिवन चारित्र्या मधून हीच विचार प्रेरणा आपण घ्यावी .असे प्रतिपादन कु. कोमल शाहू आव्हाड यांनी केले आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे उपस्थित म्हणून रंगनाथ येवले पंचायत समिती सभापती परतुर, व रामप्रसाद थोरात उपसभापती पंचायत समिती परतूर, यांची उपस्थिती होती. कार्यक्रम यशस्वीतेसाठी रामेश्वर भले ,परमेश्वर भले ,केशव भले, बाबुरावजी गोसावी, व जय मल्हार तरुण मित्र मंडळ लिंगसा व समस्त गावकरी मंडळी यांनी परिश्रम घेतले .या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन कैलाश पिसाळ यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत