धर्म, शील आणि संयमाचे रक्षण करणाऱ्यालाच खरा विजय लाभतो : महासती निर्मलाजी म.सा.

Image
जालना  प्रतिनिधी नरेश अण्णा श्रीपत संकटाच्या काळात धर्म, शील आणि संयमाचा त्याग न करता विवेकाने मार्गक्रमण करणाऱ्यालाच जीवनात खरा विजय प्राप्त होतो, असे प्रतिपादन तपकौमुदी उपप्रवर्तिनी महासती निर्मलाजी म.सा. यांनी धर्मसभेत केले. धर्म हा केवळ पूजा-अर्चा किंवा धार्मिक विधींमध्ये मर्यादित नसून तो प्रत्येकाच्या विचार, आचरण आणि निर्णयांमध्ये प्रतिबिंबित झाला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले. प्रवचनात त्यांनी स्पष्ट केले की, लोभ, मोह, अहंकार आणि स्वार्थ या दुर्गुणांमुळे मनुष्य विवेक गमावतो आणि चुकीच्या निर्णयांकडे प्रवृत्त होतो. क्षणिक सुखाच्या मोहात घेतलेले निर्णय अनेकदा आयुष्यभर दुःख आणि पश्चात्तापाचे कारण ठरतात. त्यामुळे प्रत्येकाने आत्मसंयम, करुणा आणि सद्सद्विवेकबुद्धी जोपासून धर्ममूल्यांनुसार जीवन जगावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी त्यांनी एका धर्मनिष्ठ महाराणीचा प्रेरणादायी प्रसंग सांगितला. सतीत्व आणि धर्मरक्षणावर संकट ओढवले असताना महाराणीने भीती न बाळगता धैर्य, संयम आणि बुद्धिमत्तेच्या बळावर परिस्थितीचा सामना केला. धर्माशी कोणतीही तडजोड न करता विवेकपूर्ण निर्णय घेतल्या...

परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयात मानव विकास अंतर्गत 38 सायकलचे वाटप

परतूर प्रतीनीधी हनुमंत दवंडे 
      परतूर येथील लाल बहादूर शास्त्री कन्या विद्यालयात मानव विकास अंतर्गत 38 सायकलचे वाटप दि 24 रोजी संस्थेचे सचिव कपिल आकात यांच्या हस्ते तर गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले. 
      परतूर येथील लालबहादूर शास्त्री कन्या विद्यालयात पार पडलेल्या कार्यक्रमात पालकांची उपस्थिती पण लक्षणीय होती. यावेळी बोलताना गटशिक्षणाधिकारी संतोष साबळे यांनी सांगितले की,विद्यार्थी यांचा शैक्षणिक विकास व्हावा या साठी केंद्र सरकारने ही योजना सुरू केली आहे. असे ते म्हणाले यावेळी उपस्थित केंद्रप्रमुख विष्णू ढवळे, मानवविकास चे तालुका समन्वयक श्री काठमोरे, श्रीमती स्मिता रोडगे,विजय राखे, अंकुश तेलगड,अखिल काजी,गोपनीय शाखा प्रमुख संजय वैद्य,श्याम कबाडी, रामराव घुगे,सचिन कांगने,कैलास खंदारे,अनिल काळे,बळीराम नवल,रमेश निर्वळ, सुभाष बरकुले, राजू वडेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत