लोकनेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूरमध्ये विविध सामाजिक उपक्रम उत्साहात संपन्न ,नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून रुग्णांना फळे व ब्लँकेट वाटप, वृक्षारोपण तसेच अनाथ बालकांना अन्नदान

Image
परतूर प्रतिनिधी संतोष शर्मा   दि. २२ जुलै : लोकनेते तथा महाराष्ट्राच्या राजकारणात जनसामान्यांच्या प्रश्नांना प्राधान्य देणारे दिवंगत नेते स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त परतूर शहरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. नितीन जेथलिया यांच्या पुढाकारातून आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांना पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. कार्यक्रमाची सुरुवात सकाळी १०.०० वाजता सरकारी दवाखाना, परतूर येथे करण्यात आली. यावेळी उपचार घेत असलेल्या रुग्णांना फळांचे वाटप  करण्यात आली. त्याचबरोबर रुग्णालय परिसरात वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला.  सकाळी ११.०० वाजता दृष्टी लॉयन्स, परतूर येथे रुग्णांना ब्लँकेटचे वाटप करण्यात आले. गरजू व उपचाराधीन रुग्णांना आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले दुपारी १२.०० वाजता स्नेहांकुर अनाथ आश्रम येथे अनाथ व निराधार बालकांना अन्नदान करण्यात आले. बालकांसोबत प्रेमाने संवाद साधत त्यां...

दिव्यांगांना रास्तभाव दुकाने व केरोसीन परवाना द्यावा.- अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना.


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
 दिनांक 4 /8 /2022 रोजी प्रहार संघटनेच्या वतीने जिल्हा अधिकारी साहेब जालना यांना जिल्ह्यातील दिव्यांगांना रास्तभाव दुकाने व केरोसीन परवाना देण्यात यावा या करिता निवेदन देण्यात आले आहे.
       या निवेदनामध्ये जिल्ह्यामध्ये एकापेक्षा जास्त रास्तभाव दुकाने व केरोसीन याचे परवाने दिलेले आहेत तसेच जे रद्द परवाने झालेले आहेत व जे परवानाधारक मयत झालेले आहेत व नवीन रास्तभाव दुकाने व केरोसीन परवाना दिव्यांग बांधवांना देण्यात यावा याकरिता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी जिल्ह्यातील बेरोजगार दिव्यांग बांधवांना जे शासकीय सेवेमध्ये नाहीत उत्पन्नाचे कोणतेही साधन नाही अशा बेरोजगार दिव्यांगाच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह होण्यासाठी जिल्ह्यामध्ये जे परवाने रद्द झालेले आहेत किंवा एकापेक्षा जास्त परवाने दिलेले आहेत व जे परवानाधारक मयत झाले आहेत. तसेच दिव्यांग बांधवांना नोकरीही नाही आणि रोजगारही नाही अशा दिव्यांग बांधवांना तसेच नवीन रास्तभाव दुकाने व केरोसीनचे परवाने दिव्यांग बांधवांना देण्यात यावे जेणेकरून दिव्यांगांना रोजगार उपलब्ध रोजगार उपलब्ध होईल याकरिता माननीय जिल्हाधिकारी साहेब यांनी सहानुभूतीपूर्वक विचार करून दिव्यांग बांधवांना न्याय द्यावा. अशी विनंती निवेदनामध्ये अशोक तनपुरे जिल्हा निरीक्षक प्रहार संघटना जालना यांनी केली आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत