सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

हिंदु धर्माचे काम वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उभा करणार: सिद्धेश्वर काकडे



जालना समाधान खरात 
   हिंदु धर्माचे काम वाढुऊन प्रभु. श्रीरामाच्या आशीर्वादाने भगव्याची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मनसे विद्यार्थी सेना नेते तथा श्री राम हिंदु जनजागृती संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. जिथे जिथे हिंदु धर्माचे देव देवस्थानं व तीर्थ क्षेत्र आहेत. तिथे भेटी देऊन मंदिराची आनेक ठिकाणी बिकट झालेली अवस्था चांगल्या प्रकारे करून धर्म कार्य वाढवणार असल्याचे मनसे विद्यार्थी सेना नेते तथा श्री.राम हिंदु जनजागृती संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. यासाठी लागणारा निधी आपण उभा करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले आहे. 
   हिंदु धर्माचे कार्य हे आता वाढवण्याची वेळ आलेली असून प्रत्येकाने धर्म कार्यात आपला वेळ देणे गरजेचे असून जर हे काम नाही वाढवलं तर? पुढील दिशा गंभीर अासेल म्हणून राजकारण बाजूला करत सर्वांनीच हिंदु धर्म कार्यात वाटा घेतला पाहिजे असे मत श्री.राम हिंदु जनजागृती संघाचे अध्यक्ष तथा मनसे विद्यार्थी सेना नेते सिद्धेश्वर काकडे यांनी व्यक्त केले आहे. आपण आपल्या धर्माचे काम वाढवत असताना ईतर धर्माला विनाकारण त्रास होणार नाही. याचीही आम्ही काळजी घेऊ असे मत काकडे यांनी व्यक्त केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत