सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

हिंदु धर्माचे काम वाढवण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी उभा करणार: सिद्धेश्वर काकडे



जालना समाधान खरात 
   हिंदु धर्माचे काम वाढुऊन प्रभु. श्रीरामाच्या आशीर्वादाने भगव्याची ताकद वाढवण्यासाठी प्रयत्न प्रामाणिक प्रयत्न करणार असल्याचे मनसे विद्यार्थी सेना नेते तथा श्री राम हिंदु जनजागृती संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. जिथे जिथे हिंदु धर्माचे देव देवस्थानं व तीर्थ क्षेत्र आहेत. तिथे भेटी देऊन मंदिराची आनेक ठिकाणी बिकट झालेली अवस्था चांगल्या प्रकारे करून धर्म कार्य वाढवणार असल्याचे मनसे विद्यार्थी सेना नेते तथा श्री.राम हिंदु जनजागृती संघाचे अध्यक्ष सिद्धेश्वर काकडे यांनी म्हंटले आहे. यासाठी लागणारा निधी आपण उभा करणार असल्याचे काकडे यांनी सांगितले आहे. 
   हिंदु धर्माचे कार्य हे आता वाढवण्याची वेळ आलेली असून प्रत्येकाने धर्म कार्यात आपला वेळ देणे गरजेचे असून जर हे काम नाही वाढवलं तर? पुढील दिशा गंभीर अासेल म्हणून राजकारण बाजूला करत सर्वांनीच हिंदु धर्म कार्यात वाटा घेतला पाहिजे असे मत श्री.राम हिंदु जनजागृती संघाचे अध्यक्ष तथा मनसे विद्यार्थी सेना नेते सिद्धेश्वर काकडे यांनी व्यक्त केले आहे. आपण आपल्या धर्माचे काम वाढवत असताना ईतर धर्माला विनाकारण त्रास होणार नाही. याचीही आम्ही काळजी घेऊ असे मत काकडे यांनी व्यक्त केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत