भारतीय स्टेट बँकेच्या त्रिवार्षिक निवडणुकीत प्रबंधक अतुल सावजी बिनविरोध

परतूर  प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
येथील भारतीय स्टेट बँकेचे मुख्य प्रबंधक अतुल सावजी यांची स्टेट बँक ऑफ इंडिया ऑफिसर्स असोसिएशन औरंगाबाद, जालना, परभणी, व अहमदनगर अश्या जिल्हात असलेल्या औरंगाबाद विभागात विभागीय अध्यक्ष म्हणून पुढील तीन वर्षाकरिता बिनविरोध निवड झाली आहे.
संघटनेच्या माध्यमातून अधिकारी वर्गांसाठी त्यांच्या समस्यांसाठी निस्वार्थपणे काम करण्याची जिद्द व तळमळ मनात ठेवून अतुल सावजी यांनी या पदासाठी संघटनेच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा मानस ठेवला होता. चारी जिल्ह्यामधून त्यांची उमेदवारी बिनविरोध अशी ठरली. एकंदरीत निवडणूक असली म्हणजे हेवे दावे तसेच प्रत्येकाला लोकशाही पद्धतीने निवडणुकीत उभे राहण्याचा हक्क असतो परंतु भारतीय स्टेट बँक अधिकारी संघटना ही या गोष्टीला अपवाद ठरली आहे. बँकेच्या औरंगाबाद विभागामध्ये पूर्ण कार्यकारणी बिनविरोध निवडून आली आहे.
यावेळी बिनविरोध निवड झालेले नवनिर्वाचित अध्यक्ष अतुल सावजी यावेळी बोलताना अधिकारी वर्गांच्या समस्या प्रामाणिकपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार असल्याचा मानस यांनी व्यक्त केला आहे. भविष्यात येणाऱ्या  अधिकारी वर्गाच्या अडीअडचणी तसेच बँकिंग जीवनातील नवी दिशा देण्यासाठी या पदाचा उपयोग करून करणार असल्याचे ते म्हणाले. जीवनाच्या तरुण वयापासून समाजसेवेची विशेष आवड असलेले तसेच बँकिंग क्षेत्रात विविध पदावर काम करत असताना सेवाभाव ठेवून कार्यरत असलेलं अतुल सावजी हे एक धडपडीचा व्यक्तिमत्व आहे.
 
,
भारतीय स्टेट बँक परतुर शाखेमध्ये मागील तीन महिन्यापासून अनेक बदल केले. आहे. कार्याची चुणूक दाखवली आहे. येणाऱ्या काळात अशाच प्रकारे बँकेची सेवा सुधारणा तसेच अधिकारी वर्गाच्या समस्या सोडवण्याचा मानस आहे. अतुल सावजी, मुख्य प्रबंधक, भारतीय स्टेट बँक परतुर  
फोटो ओळी.. अतुल सावजी, मुख्य प्रबंधक, भारतीय स्टेट बँक परतुर

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती