सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

बी.रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार जाहीरपरतूर येथील श्री पतंजली आयुर्वेद क्लिनिकचा वाङ्मयीन उपक्रम.



मंठा प्रतिनीधी सुभाष वायाळ
परतूर येथील श्री पतंजली आयुर्वेद क्लिनिकच्या वतीने यावर्षीपासून कवी बी.रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार देण्यात येणार आहेत.
      मराठवाड्याचे भूमिपुत्र असलेले कवी बी. रघुनाथ यांचे मराठी वाङ्मयाच्या क्षेत्रात फार मोठे योगदान आहे. जालना जिल्ह्यातील सातोना ही जन्मभूमी असलेल्या बी.रघुनाथ या महान साहित्यिकाचा स्मृतीदिन दरवर्षी राज्यातील साहित्यिकांना त्यांच्या नावे पुरस्कार देऊन साजरा करण्यात येणार आहे.  
       यावर्षी कथा, कादंबरी, कविता, वैचारिक लेखन, ललित लेखन आदी साहित्य प्रकाराचे लेखन करणाऱ्या मंठा-परतूर तालुक्यातील लेखकांना बी. रघुनाथ स्मृती साहित्य पुरस्कार देण्यात येणार असून यामध्ये परतूरचे लेखक छबुराव भांडवलकर (कादंबरी, कथा), प्रा.डॉ.अशोक पाठक (कविता), प्रा.डॉ.सदाशिव कमळकर (वैचारिक लेखन), व डॉ.धोंडोपंत मानवतकर (ललितलेखन ) या साहित्यिकांना हे पुरस्कार घोषित करण्यात आले आहेत.
      पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, मानपत्र, शाल, श्रीफळ असे असून हे पुरस्कार लवकरच एका समारंभात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिकांच्या हस्ते प्रदान करण्यात येतील, असे डॉ.दीपक भगवानराव दिरंगे यांनी श्री पतंजली आयुर्वेद क्लिनिकच्या वतीने घेण्यात आलेल्या बी.रघुनाथ स्मृतिदिनाच्या कार्यक्रमात जाहीर केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत