पत्रकार अजय देसाई यांना बी.रघुनाथ साहित्य पुरस्कार जाहीर




परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
       येथील पत्रकार, कवी, लेखक , साहित्यकार अजय देसाई यांना पत्रकार अजय देसाई यांना बी.रघुनाथ साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. श्री पतंजली आयुर्वेद क्लिनिकच्या वतीने वाङ्मयीन उपक्रमांतर्गत बी.रघुनाथ स्मृती दिनानिमित्त सदरील पुरस्कार जाहीर करण्यात आला असल्याची माहिती पतंजली आयुर्वेद क्लिनिकचे डॉ दीपक दिरंगे यांनी ही माहिती दिली.
 यात कथा,कादंबरी,कविता,वैचारिक लेखन, ललित साहित्य आदी साहित्य प्रकाराचे लेखन करणा-या मंठा-परतूर तालुक्यातील लेखकांना हे पुरस्कार देण्यात येणार आहेत. 
      पुढील सन्मानीय साहित्यिकांना हे पुरस्कार घोषित करण्यात आले असल्याचे ते म्हणाले यापूर्वी छबुराव भांडवलकर (कादंबरी, कथा),डाॅ.प्रा.अशोक पाठक (कविता),डाॅ.प्रा सदाशिव कमळकर(वैचारिकलेखन),
डाॅ.धोंडोपंत मानवतकर(ललितलेखन)
या मान्यवरांचे नाव घोषित करण्यात आले होते. परतूर शहर विभागातून अजय देसाई यांच्या नावाची त्यांनी घोषणा केली . देसाई यांनी निसटते क्षण चारोळी संग्रह, ओला अंधार कादंबरी, आत्मसमर्पण नाट्य कथा, वडाचे झाड कविता साहित्य, ललित, लेख अशा अनेक लेखनातून परतूर तालुक्यातील साहित्य चळवळ तेवत ठेवण्यासाठी पुढाकार घेतला, या दृष्टीने त्यांना सन्मान म्हणून त्यांना हा पुरस्कार देण्यात येणार असल्याची माहिती यावेळी डॉ दीपक दिरंगे यांनी दिली. या सर्व साहित्यिकांना लवकरच एका समारंभात महाराष्ट्रातील सुप्रसिध्द साहित्यिकाच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येतील. पुरस्काराचे स्वरूप स्मृती चिन्ह, मानपत्र, शाल,श्रीफल असे असणार आहे. या पुरस्काराबद्दल माजी मंत्री आ.बबनराव लोणीकर, मा आ सुरेशकुमार जेथलिया, शिवसेना जिल्हाप्रमुख ऐ जे बोराडे, राष्ट्रवादी युवक जिल्हा अध्यक्ष कपिल अकात, जेष्ठ साहित्यिक प्राचार्य डॉ भगवान दिरंगे,महाराष्ट्र राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी ढोबळे यांच्यासह साहित्य प्रेमींनी सर्वांचे अभिनंदन केले आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती