सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

महाराजा श्री.अग्रसेन यांची जयंती परतूर मधे उत्साहात साजरी

 परतूर/प्रतिनिधी- कैलाश चव्हाण
       येथे आज सोमवार दि.२६ रोजी अग्रोहा नरेश छत्रपती महाराजा श्री.अग्रसेन यांची ५१४६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.प्रारंभी शहरातून सकाळी ८ वाजता मोटारसायकल रॅली काढण्यात येऊन महाराजा श्री.अग्रसेन यांच्या प्रतिमेची रथाद्वारे मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली.यावेळी या मिरवणुकीत पुरुष,महिलांसह लहान मुलांची-मुलींची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
         दरम्यान मिरवणूकीनंतर मोंढा भागातील श्री.बालाजी मंदिरात यजमान अनिलकुमार बगडीया यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.याप्रसंगी व्यासपीठावर अग्रवाल सेवा समितीचे अध्यक्ष निखिल अग्रवाल,कार्याध्यक्ष रोशन बगडीया,अग्रवाल महिला मंडळाच्या अध्यक्षा श्वेता कंसल,सचिव बिंदीया केजडीवाल यांची प्रमुख उपस्थिती होती.या कार्यक्रमात अग्रवाल महिला मंडळ यांनी जयंती निमित्त आयोजित केलेल्या स्पर्धेचे बक्षिस वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.जयंतीनिमित्त जालना येथील डॉ.अनिता तवरावाला यांचा सामाजिक प्रबोधनावर विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.जयंतीनिमित्त जालना येथील जनकल्याण रक्तपेढीच्या वतीने रक्तदान शिबीर आयोजित करण्यात आले,या शिबिरात पुरुष महिलांसह १६ जणांनी स्वेच्छेने रक्तदान केले.यावेळी महाराजा श्री.अग्रसेन यांची जयंती साजरी करण्यासाठी समितीचे अध्यक्ष निखिल अग्रवाल,उपाध्यक्ष राजेश बगडीया,सचिव श्रेणीक बगडीया,सहसचिव जगदीश अग्रवाल,कोषाध्यक्ष योगेश मोर,कार्याध्यक्ष रोशन बगडीया यांच्यासह समितीचे सदस्य अभिषेक अग्रवाल,अभिलाष केजडीवाल,निलेश बगडीया,नवीन बगडीया,महेश मोर,प्रणय मोर,सौरभ भारुका तसेच सल्लागार श्रीकिसन अग्रवाल,राजगोपाल मोर,मुकेश केजडीवाल,शांतीलाल अग्रवाल,आनंद बगडीया,दिनेश बगडीया,गोविंद मोर,अरविंद मोर,युधिष्ठिर(सोनू)अग्रवाल,अमोल अग्रवाल,सौरभ बगडीया यांनी विशेष परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत