सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

यश ग्रुप ऑफ इन्स्टिटयूट येथे बाल दिन उत्साहात साजरा

 परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
     तालुक्यातील सातोना येथील यश प्रायमरी इंग्लिश स्कूल तसेच यश प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सातोना येथे आज पं. जवाहरलाल नेहरू यांच्या जयंतीनिमित्त 'बालदिन' मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. 
     चाचा नेहरू यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली.यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशालेचे मुख्याध्यापक शामीर शेख तसेच प्रमुख पाहुणे म्हणून बहुरूपी कैलास शिंदे व भारत शिंदे, विलास गोरे यांची उपस्थिती होती. यावेळी शामीर शेख, जयराम खंदारे यांनी चिमुकल्यांना मोलाचे मार्गदर्शन करत शुभेच्छा दिल्या.तसेच बहुरूपीनी सुद्धा आपल्या कलेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भरपूर हसवले. मुलांनीही चाचा नेहरूविषयी मनोगत व्यक्त केली.
  दरम्यान विविध पशु पक्ष्याच्या वेशभूशेत आलेल्या विद्यार्थ्यांनी बालमित्रांना संगीताच्या जोमात मनसोक्त आनंद दिला. यावेळी येथील शिक्षकांनी विविध खेळांचे आयोजनही केले होते.अनेक मुलांनी प्राण्यांची आवाज काढली. कोणी गाणी म्हणली. यात शिक्षकांनीही जणु बालपणात जाऊन बालगोपालसोबत आस्वाद घेतला.यावेळी मुलांना चॉकलेट वाटप करण्यात आली.
संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचलन गणेश गोरे यांनी तर आभार अश्विनी कोळपे यांनी व्यक्त केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दीपा सावंत, राधिका आकात, सीमा पवार, महादेव गायकवाड,मंजुषा बोराडे, मालन सु्रोडकर, निलेश यांनी परिश्रम घेतले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत