प्रलोभनांना बळी न पडता गावच्या विकास करणाऱ्यांना निवडुण दया - अशोक साबळे


परतूर / प्रतिनिधी कैलाश चव्हाण
सध्या निवडणुकिचे गावागावात धुमशान सुरू आहे . यात अनेक उमेदवार जाहीर असून विविध खोटे प्रलोभने दाखवून मतदार बांधवांची दिशाभुल करून फसवणूक करतात . आज रोजी निवडणूक रिंगणात सरंपच पदावर उभे असणारे उमेदवार यांनी गावाच्या विकासासाठी कोणते योगदान दिले हे तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे . यामुळे मतदार बांधवांनी विचारपूर्वक कुणाच्याही भुलथापांना वळी न पडता गावया विकास करणारा उमेदवार निवडावा . 
सन २० १७ - २०१८ ला गावातील शाळांत खोली बांधकाम भ्रष्टाचार उघड करून उर्वरित बांधकाम पुर्ववत सुरु केले. तसेच गावातील अंगणवाडी गावापासून 3किमी अंतरावर भरत असल्याने ति पूर्णवत गावात आणली . व सर्व बालकांना पोषन आहार मिळाला . गावच्या मुख्यरस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी तब्बल ६ दिवस उपोषन केले . विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून गावातील पाणी पुरवठा करणारी कोरडी विदीर आधिग्रहण घोटाळा उघड केल्याने गावाला पाणी मिळाले. 
         आज गावात शुद्ध मुकलब पिण्याचे पाणी नाही . गावात अंगणवाडी व्यवस्थित नाही . गावातील प्राथमिक शाळा गावापासून अंदाजे 3 किमी अंतरावर आहे .
गावातील शाळा 3 किमी अंतरावर आसल्याने गावचे भविष्य उज्ज्वल करणारी पिढी शिक्षणापासून वंचित राहू शकते. 
गावात धोबिघाट नाही . 
मराठा व बोद्ध स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी शासन दरवारी मागणी 
गावात विजेची समस्या जानवते अश्या अनेक सुविधा गावात नसल्याने आपले गाव विकासा पासून कोसो दूर अश्याच उमेदवारांनी ठेवले आहे. जे सध्या खोटे बोलून मोठमोठी विकासाची स्वप्न दाखवतात.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती