सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

प्रलोभनांना बळी न पडता गावच्या विकास करणाऱ्यांना निवडुण दया - अशोक साबळे


परतूर / प्रतिनिधी कैलाश चव्हाण
सध्या निवडणुकिचे गावागावात धुमशान सुरू आहे . यात अनेक उमेदवार जाहीर असून विविध खोटे प्रलोभने दाखवून मतदार बांधवांची दिशाभुल करून फसवणूक करतात . आज रोजी निवडणूक रिंगणात सरंपच पदावर उभे असणारे उमेदवार यांनी गावाच्या विकासासाठी कोणते योगदान दिले हे तुम्हा आम्हा सर्वांना माहित आहे . यामुळे मतदार बांधवांनी विचारपूर्वक कुणाच्याही भुलथापांना वळी न पडता गावया विकास करणारा उमेदवार निवडावा . 
सन २० १७ - २०१८ ला गावातील शाळांत खोली बांधकाम भ्रष्टाचार उघड करून उर्वरित बांधकाम पुर्ववत सुरु केले. तसेच गावातील अंगणवाडी गावापासून 3किमी अंतरावर भरत असल्याने ति पूर्णवत गावात आणली . व सर्व बालकांना पोषन आहार मिळाला . गावच्या मुख्यरस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यासाठी तब्बल ६ दिवस उपोषन केले . विविध वृत्तपत्रांच्या माध्यमातून गावातील पाणी पुरवठा करणारी कोरडी विदीर आधिग्रहण घोटाळा उघड केल्याने गावाला पाणी मिळाले. 
         आज गावात शुद्ध मुकलब पिण्याचे पाणी नाही . गावात अंगणवाडी व्यवस्थित नाही . गावातील प्राथमिक शाळा गावापासून अंदाजे 3 किमी अंतरावर आहे .
गावातील शाळा 3 किमी अंतरावर आसल्याने गावचे भविष्य उज्ज्वल करणारी पिढी शिक्षणापासून वंचित राहू शकते. 
गावात धोबिघाट नाही . 
मराठा व बोद्ध स्मशानभूमी साठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी यासाठी शासन दरवारी मागणी 
गावात विजेची समस्या जानवते अश्या अनेक सुविधा गावात नसल्याने आपले गाव विकासा पासून कोसो दूर अश्याच उमेदवारांनी ठेवले आहे. जे सध्या खोटे बोलून मोठमोठी विकासाची स्वप्न दाखवतात.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत