सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतुर येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

परतुर प्रतिनिधी कैलाश चव्हाण 
देशात व राज्यात रक्ताचा तुटवडा आणि वारंवार होणारे अपघात तसेच अवघड शस्रक्रियेत रुग्णांना लागणारे रक्त त्यासाठी रुग्णाच्या नातेवाईकांना करावी लागणारी भटकंती यांची जाणीव ठेवुन सामाजिक संघटना,रक्तपेढी मार्फत वेळोवेळी रक्तदान शिबीर आयोजित केली जातात.याच सामाजिक जाणिवेतुन परतुर शहरात अखिल भारतीय अग्रवाल संमेलन,प्रल्हादपुर स्वच्छता प्रेमी आणि कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळ यांच्या तर्फ भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन दि.8/5/2023 रोज सोमवार सकाळी 8ते 3 या वेळेत करण्यात आले आहे.आपल्या दानाने आपण गरजुचे प्राण वाचवु शकतो अशी सामाजिक जाणीव ठेवुन जास्तीत जास्त रक्तदात्यांनी रक्तदान करावे अशी विनंती अखिल भारतीय अग्रवाल संमेलन,स्वच्छता प्रेमी समुह तसेच श्री.कुरुक्षेत्र महादेव भक्त मंडळांनी केले आहे.स्थळःश्री.कुरुक्षेत्र महादेव मंदिर,रांजणी रोड,परतुर.वेळःसकाळी 8 ते दुपारी 3

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत