सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

नवराञातच परतुरात वीज पाण्याचे वांदे..? 8 दिवसापासून निर्जळी; परतूर पालिकेचा भोंगळ कारभार



                                                                              

परतूर(प्रतिनिधी)
शहरामध्ये गेल्या 8-10 दिवसापासून नगरपालिका व वीज वितरण कंपनीचा भोंगळ कारभार चालला असून हिंदू धर्मातील सर्वात महत्त्वाचे असलेला नवरात्र दरम्यान गेल्या आठ ते दहा दिवसापासून परतूर शहरामध्ये मोंढाभागातील अनेक काॅलनीत दुरूस्तीच्या नावाखाली पुर्वकल्पना न देता व पर्यायी व्यवस्था न करता पालिकेने ऐन नवराञातच शहराचा पाणीपुरवठा बंद केल्यामुळे नागरिकात व महिला वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.तसेच पालिकेच्या कुपनलिका बंद व नादुरुस्त असल्याने तसेच,टँकरने सुध्दा पाणीपुरवठा होत नसल्याने नागरिक वैतागले आहेत,पालिकेने पाणीपुरवठा संदर्भात पर्यायी व्यवस्था करणे अपेक्षित होते पण पालिकेच्या ढिसाळ कारभारामुळे ते सुध्दा करणे झाले नाही यामुळे शहरातील नागरिकांचे अक्षरशः हाल होत आहेत.अगोदरच कोरोना महामारीची भीतीचा प्रकोप त्यात हिंदू सणांमध्ये घरातील साफसफाई यासाठी लागणाऱ्या पाण्यासाठी नागरिकांना व महिलांना नवराञाचा नऊ दिवसाचा उपवास असुन सुध्दा गल्लोगल्ली भांडे घेऊन पाण्याच्या शोधात फिरावे लागत आहे. महिन्यातून केवळ पाच ते सहा वेळाच अस्वच्छ व गढुळ तसेच दुषित पाणी येणे हे नित्याचेच झाले आहे.याशिवाय नेहमीच मोटार मध्ये बिघाड किंवा कुठे पाईप फुटणे या कारणावरून आठ आठ दिवसापर्यंत नागरिकांना पाण्याची प्रतीक्षा करावी लागते .पालिकेचा एकही कर्मचारी व अधिकारी तसेच लोकप्रतिनीधी पाण्याविषयी बोलायला तयार नाही. शहरातील नागरिक व महिला नवराञात मात्र हातामध्ये भांडे घेऊन गल्लीबोळात पाण्याच्या शोधात फिरताना दिसतात. ऐन सणासुदीत विज पाण्याविना नागरिकांचे हाल होत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे अगोदरच पालिका प्रशासनावर स्वच्छता, आरोग्य विषयक प्रश्न,रस्ते,भुमिगत गटारामुळे शहरातील रस्त्याची झालेल्या चाळणीमुळे नागरिक प्रचंड वैतागलेले आहेत.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत