सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

मनसेच्या प्रयत्नाला यश, संजीवनी हॉस्पिटलची होणार चौकशी




जालना शहरातील संजीवनी हॉस्पिटलमध्ये काळा बाजार व गोर गरीब रुग्णांची आर्थिक लुट व तसेच रुग्णांना चांगले ऊपचार  मिळत नसल्याची तक्रार महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना राज्य कार्यकारणी सदस्य सिद्धेश्वर काकडे यांनी जालना जिल्हाधिकारी यांच्याकडे सादर केली आसता. जालना जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार जिल्हाधिकारी यांचे स्विय्य सहाय्यक खेडेकर यांनी पत्र काढुन येत्या दोन ते तीन दिवसामध्ये जालना येथील संजीवनी हॉस्पिटलची चौकशी करुन हाॅस्पीटलचा कारभार व हाॅस्पीटलचा रेकॉर्ड मनसेचे सिद्धेश्वर काकडे यांना देणार आहेत. तसेच जालना जिल्ह्यातील ज्या रुग्ण नातेवाईक यांना ईतर ठिकाणी हाॅस्पीटल व ईतर समस्यांचा सामना करावा लागत आसेल तर आपल्याशी संपर्क साधावा कोरोना  काळामध्ये वाढणारे हॉस्पिटलचे बिल व मदत केली जाईल आसी माहीती काकडे यांनी दिली आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत