सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या जालना प्रभारी जिल्हाध्यक्ष पदी पांडूरंग शेजूळ

  
परतूर –प्रतिनिधी

तालुक्यातील आनंदवाडी येथील  पत्रकार पांडुरंग तुळशीराम शेजुळ यांची अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघ महाराष्ट्र प्रदेशच्या जालना जिल्हा प्रभारी जिल्हाध्यक्ष एका पत्राद्वारे  राष्ट्रीय अध्यक्ष मनोहरराव सुने, प्रदेशाध्यक्ष कैलास देशमुख यांनी  केली आहे.
सदरील नियुक्ती ही अखिल भारतीय ग्रामीण पत्रकार संघाच्या नियम व अटीच्या अधीन राहून केली जात असून कोणत्याही नियमबाहया कृती न करता समाज माध्यमातून आपल्या लेखणीतून जन सामान्य जनतेचे प्रश्न मांडून वाचा फोडून न्याय देण्याचे अविरत कार्य करावे. असे नियुक्ती पत्रात म्हटले आहे. या नियुक्ती बद्दल परतूर पत्रकार संघाचे अध्यक्ष शेषराव वायाळ,राज्य पत्रकार संघाचे अध्यक्ष बालाजी ढोबळे, सचिव दीपक हिवाळे,  शामसुंदर चित्तोडा, अजय देसाई, योगेश बरीदे, एम.एल. कुरेशी, आशीष गारकर, भारत सवने, आर.एम. नवल, राजकुमार भारुका, सरफराज नाईकवाडी, सुरेश कवडे, अशोक साकळकर, इम्रान कुरेशी, प्रभाकर प्रधान, संजय देशमाने, सागर काजळे, तारेख शेख, मुमताज अंसारी, राहुल मुजमुले, माणिक जैस्वाल, संतोष आखाडे, शेख असेफ, शेख अथर, कैलास चव्हाण, कैलास सोळंके, कृष्णा धोंगडे, सय्यद तय्यब, वाजेदभाई यांनी अभिनंदन केले आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत