सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

केहाळ वडगाव येथे पौर्णिमा उत्साहात साजरी - भारतीय बौद्ध महासभेच्या शाखेचे उद्घाटन



 मंठा- (सुभाष वायाळ)दि. 22 मंठा तालुक्यातील केहाळ वडगाव येथे भारतीय बौद्ध महासभा आयोजित जयपुर सर्कल बारागाव गट पौर्णिमा या निमित्त केहाळ वडगाव येथे भव्य  बौद्ध पौर्णिमेचे आयोजन केले होते. या पोर्णिमे निमित्त भारतीय बौद्ध महासभेचे वडगाव शाखा उद्घाटन कार्यक्रम सुद्धा पार पडला. यावेळी भारतीय बौद्ध महासभा जालना जिल्हा अध्यक्ष महिंद्र बनकर साहेब भारतीय बौद्ध महासभा मंठा तालुका अध्यक्ष विष्णू वाघमारे, अतुल खरात ,दत्तात्रय चोरमारे ,गौतम अंभोरे . विठ्ठल मोरे, आत्माराम मोरे, अशिष मोरे ,किरण मोरे ,अशोक रणवीर , प्रकाश खाडे ,दत्तात्रय प्रधान, यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये शाखेचे उद्घाटन पार पडले. व नवनिर्वाचित सर्व शाखा सदस्यांना निवडून निमित्त शुभेच्छा दिल्या  पूर्णिमा ची सुरुवात महापुरुषांच्या फोटो पुष्पहार अर्पण करून करण्यात आली . या पौर्णिमाची मुख्य आकर्षक राहिल्या त्या माहोरा येथील मुली व मुलं या मुलांनी प्रमुख उपस्थित नागरिकांना चांगले पैकी या मार्गदर्शन केले  .केहाळ वडगाव येथील संपूर्ण ग्रामस्थांनी पौर्णिमेचे उत्तम प्रकारे आयोजन केले होते. संपूर्ण जयपुर सर्कल परिसरातील समाज बांधव आदी या पौर्णिमेला उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत