सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

मंगरूळ ते गेवराई शिव पांदन रस्त्याचं तहसीलदार वाघमारे यांच्या हस्ते उदघाट्न-


मंठा -(सुभाष वायाळ)दि.28 मंठा तालुक्यातील मंगरूळ गावठान ते गेवराई शिव पादंन रस्त्याच्या पांदन मुक्ती रस्ता उद्घाटनप्रसंगी मंठा तहसिलदार श्री कैलासचंद्र वाघमारे सरांनी रस्त्याचे उद्घाटन केले या प्रसंगी गावचे तलाठी लोखंडे सर, ग्रामसेवक जाधव सर, ग्रा.पं. प्रशासक धोत्रे सर, सहशिक्षक संदिप उगले सर (निवडणूक विभाग), केंद्र प्रमुख विष्णू बागल सर, पोलिस पाटील कचरु मगर, उपस्थित होते.या प्रसंगी तहसीलदार साहेबांचा सत्कार गावातील ज्येष्ठ नागरिक बाबासाहेब बागल व लिंबाजीराव बागल यांच्या हस्ते करण्यात आला. मनोगत व्यक्त करताना तहसीलदार साहेबांनी शेतरस्त्यांचे महत्त्व व गरज विशद केली,पुढे बोलताना त्यांनी शेतकऱ्यांचे कौतुक केले व विविध शासकीय योजना,कोरोना लसीकरण व रस्ता पादंन मुक्ती साठी शेतकऱ्यांना मदत करण्याच्या सुचना प्रशासनाला दिल्या.. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रदीप उगले यांनी केले तर आभार दिपक बागल  यांनी मानले, कार्यक्रम यशस्वीतेसाठी आनंद बागल, वसंत बागल,विठ्ठल बागल, कल्याराव राजबिंडे,मुरली घांडगे, राधाकिसन बागल,सिध्देश्वर बागल , शंकर बागल यांनी परिश्रम घेतले.. या निर्णयामुळे गावचा दहा वर्षांपासूनचा रस्त्याचा प्रश्न मिटणार आहे यामुळे वाघमारे यांचे गावकरी कौतुक करत आहेत

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत