सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

अग्रवाल परिवाराच्या वतीने हॉटेल अतिथी येथे हळदी कुंकवाचा कार्यक्रम संपन्न



परतूर/हनूमंत दंवडे -हॉटेल अतिथी येथे परतूर शहरातील महिला साठी कोरोना नियमाचे पालन करीत हळदी कुंकवाचा कार्यक्रम सौ.आरती मोहन अग्रवाल , सौ.छाया अनिल अग्रवाल, सौ.निशा तेजस अग्रवाल यांनी परतूर येथील हॉटेल अतिथी येथे आयोजित केला होता.
       पर्यायवरणासाठी घरातील प्रत्येकानी एक एक झाड लावावे म्हणून मकर संक्रांतीचे वाण भेट म्हणून झाडासाठी कुंड्या ह्या भेट म्हणून देण्यात आल्या. परतूर शहरातील सर्वच स्तरातील महिलांनी या मध्ये सहभाग नोंदविला होता. प्रत्येक महिलांसाठी कोविड नियमाचे पालन करीत आसन व्यवस्था व नाष्टा सोय ही अग्रवाल परिवाराच्या वतीने करण्यात आली होती.
     महिलांसाठी फोटो सेशन करीता सेल्फी पॉईंट सुद्धा लावण्यात आले होते. 
      सदरील कार्यक्रम हा परतूर शिवसेना जिल्हा संघटक मोहन अग्रवाल यांच्या परिवाराच्या वतीने आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी सौ.आरती अग्रवाल, सौ.छाया अग्रवाल, सौ.निशा अग्रवाल, सौ.सोनू केजरीवाल, सौ.सीता अग्रवाल, सौ.हेमा अग्रवाल, सौ.स्वाती अग्रवाल, सौ.रोशनी अग्रवाल, सौ.कंचन अग्रवाल, सौ.पद्मा अग्रवाल यांच्या सह अनेक महिलांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदविला होता।

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत