सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

रोहन आकात" यांच्या वतीने स्वखर्चाने गरजुवंतांना वरफळ येथे रगीचे वाटप

"

परतूर/ प्रतिनिधी(शेख अथर )


समाजाचं काही देणं लागतो ही युक्ती मनात ठेवून भाजपा युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष रोहन आकात यांनी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर व राहुल लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपा जेष्ट नेते विलास आकात यांच्या हस्ते वरफळ गावातील गरजूवंतांना रगीचे वाटप करण्यात आले
भाजपा तालुका सरचिटणीस सुधाकर बेरगुडे यांनी यावेळी सांगितले की सामाजिक भान ठेवत नेहमीच विलास आकात व रोहन आकात यांच्या माध्यमातून अनेक उपक्रम राबविण्यात येतात परंतु आज जो गोरगरीब व गरजूवंतांना थंडीच्या दिवसात आवश्यक असलेल्या रगी वाटप करून एक आदर्श कार्य केल्याचे सांगितले
यावेळी सरपंच नदीम पटेल यांनीही मनोगत व्यक्त केले
यावेळी मधुकर गोरे,शेख रउफ,साहेबराव घोंगडे,खाजा भाई,जीवन रेंगले, गुलाब सावंत,आसेफ भाई, योगेश खंडागळे बशीर भाई रणजीत बेरगुडे, दत्ताभाऊ डोईजड,गजानन गोरे,संजय गोरे,जानकीराम गोरे,तसेच बबन दादा आकात यासीन भाई जफर भाई दत्तात्रेय आकात कैलास आकात,पाशा भाई,यांच्यासह अनेक मान्यवर व गावकऱ्यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत