सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर तालुक्यात नवीन साखर कारखाना निर्माण होणार... मनसे नेते दिलीप- बापु धोत्रे===============

परतूर /हनुमंत दवंडे 
मराठवाडा दौरयाच्या अनुषंगाने,दि.३० जानेवारी रोजी जालना जिल्ह्यातील परतूर मंठा तालुक्यातील परतूर शहरातील शासकीय विश्रामगृहमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांची बैठक मनसे नेते मा.दिलीप(बापू)धोत्रे, मार्गदर्शन करताना  म्हणाले की परतूर मंठा तालुक्यातील स उत्पादक शेतकर्‍यांचा प्रश्न लक्षात घेता परतूर मंठा तालुक्यात नवीन साखर कारखाना निर्माण करण्याची इच्छा आहे,लवकरच साखर उद्योग सुरू करु असंही धोत्रे म्हणाले, श्री धोत्रे यांच्या कडे पंढरपूर सोलापूर धाराशिव या ठिकाणी त्यांच्या मालकीचे दोन साखर कारखाने आहेत, त्यांनी मागच्या आठवड्यात पंढरपूर येथे इथेनॉल प्रकल्पाचे भूमिपूजन करून प्रकल्पाला सुरुवात केली आहे, पक्ष वाढविण्याच्या संदर्भात सविस्तर मार्गदर्शक केले, प्रदेश सरचिटणीस मा.संतोष(भाऊ)नागरगोजे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.यावेळी विविध पक्षातील कार्यकर्त्यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला.यावेळी जालना जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळंके, बालाजी मुंडे महाराष्ट्र नवनिर्माण शेतकरी सेना राज्य उपाध्यक्ष,परभणी जिल्हाध्यक्ष राज शेख,परभणी परभणी जिल्हाध्यक्ष गणेश सुरवसे, रामजी नवल जिल्हा उपाध्यक्ष,मंठापरतूर तालुका अध्यक्ष कृष्णा गोवर्धन सोळंके,मंठा तालुका अध्यक्ष गणेश ज्ञानेश्वर बोराडे,परतूर तालुका संघटक वैजनाथ बन,तालुका उपाध्यक्ष भारत शेळके,परतूर शहराध्यक्ष सोपान गोरे,उपशहराध्यक्ष विश्वंभर कुलकर्णी, विद्यार्थी सेना जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर केवारे,विद्यार्थी सेना तालुका अध्यक्ष महेश धापसे,माजी जिल्हाउपाध्यक्ष ऍड.राजेश खरात,रामेश्वर घुंगराट, सवाईराम राठोड,विलास काळे शाम देवडे,मंठा माजी शहराध्यक्ष संजय हानवते,आदित्य केंदळे अर्जुन मोहिते, तुकाराम कदम, अर्जुन नवले, गजानन झोल, अमोल सरोदे, मोहन सरोदे,राम गटकळ, कृष्णा बापु सोळंके यांसह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते, मोठ्या संख्येने ऊस उत्पादक शेतकरी उपस्थित होते...

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत