सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शिवरायांचा पुतळा ऊठवला तर? प्रशासनाला धडा शिकवला जाईल -काकडे




बुलढाणा(रवी पाटील) बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील लखोजी राजे राजवाड्याजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा कुठलीही परवानगी न घेता बसवण्यात आला आहे. यावर प्रशासन हा पुतळा ऊठवण्याचा डाव आखत आसुन या सिंदखेडराजा तालुका व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात चांगलेच वातावरण तापले आहे. यात शेतकरी क्रांती सेनाने देखील ऊडी घेतली आसुन छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे, कष्टकरी कामकरी, शेतकरी व गोर गरीब जणतेचे म्हणजेच रयतेचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कुठं ऊभारायचा? हे जर प्रशासन ठरवत आसेल तर हि शोकांतिका आहे. प्रशासनाने परवानगी मंजुर करावी. पण पुतळा ऊठवण्याचे नाटकं करु नये. अन्यथा बुलढाणा जिल्हा प्रशासनाला धडा शिकवला जाईल आसा खणखणीत इशारा शेतकरी युवा नेते तथा शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. शिवरायांच्या पुतळ्याला हात लावला तर बुलढाणा जिल्हाधिकारी यांना शेतकरी क्रांती सेनेचा हिसका दाखवला जाईल आसा ईशाराच शेतकरी आक्रमक युवा नेते सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत