सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

शिवरायांचा पुतळा ऊठवला तर? प्रशासनाला धडा शिकवला जाईल -काकडे




बुलढाणा(रवी पाटील) बुलढाणा जिल्ह्यातील मातृतीर्थ सिंदखेडराजा येथील लखोजी राजे राजवाड्याजवळील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा हा कुठलीही परवानगी न घेता बसवण्यात आला आहे. यावर प्रशासन हा पुतळा ऊठवण्याचा डाव आखत आसुन या सिंदखेडराजा तालुका व जिल्हा प्रशासनाच्या विरोधात चांगलेच वातावरण तापले आहे. यात शेतकरी क्रांती सेनाने देखील ऊडी घेतली आसुन छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे, कष्टकरी कामकरी, शेतकरी व गोर गरीब जणतेचे म्हणजेच रयतेचे राजे होते. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळा कुठं ऊभारायचा? हे जर प्रशासन ठरवत आसेल तर हि शोकांतिका आहे. प्रशासनाने परवानगी मंजुर करावी. पण पुतळा ऊठवण्याचे नाटकं करु नये. अन्यथा बुलढाणा जिल्हा प्रशासनाला धडा शिकवला जाईल आसा खणखणीत इशारा शेतकरी युवा नेते तथा शेतकरी क्रांती सेना संस्थापक अध्यक्ष सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे रयतेचे राजे होते. शिवरायांच्या पुतळ्याला हात लावला तर बुलढाणा जिल्हाधिकारी यांना शेतकरी क्रांती सेनेचा हिसका दाखवला जाईल आसा ईशाराच शेतकरी आक्रमक युवा नेते सिध्देश्वर काकडे यांनी दिला आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत