सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

रायपूर येथे ओबीसीची बैठक संपन्न..======


परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
परतुर: दिनांक 5 जानेवारी 2022रोजी हनुमान मंदिर रायपूर येथे ओबीसी समाजाची बैठक पार पडली. दिनांक 11 जानेवारी 2022 रोजी वाटुर तालुका परतुर येथे होणाऱ्या रास्ता रोको  आंदोलनासाठी या बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली .ओबीसी आरक्षण हा केंद्र आणि राज्य सरकारचा डावआहे ,ओबीसींचे राजकीय आरक्षण का गरजेचे आहे? यावर शिवाजीराव तरवटे साहेब यांनी आपले विचार मांडले  तर भारत हा पूर्वीपासून खेड्यांचा देश असून या खेड्यात सुद्धा बारा बलुते दार आणि अठरा आलुते दार पद्धती होती असे राम प्रसाद थोरात सर यांनी सांगितले. ओ.बी.सी. आरक्षण सरकारने हिसकावून घेऊ नये यासाठी सर्व ओबीसी बांधवांनी एकत्रित येऊन एल्गार करावा असे आवाहन अशोक राव आघाव साहेब यांनी केले. आता राजकीय आरक्षण काढले आता शैक्षणिक आरक्षण काढतील यावर प्रवीण काका सातोनकर साहेब यांनी आपले मत मांडले या बैठकीसाठी परतूर पंचायत समितीचे उपसभापती रामप्रसाद जी थोरात सर माजी जिल्हा परिषद सदस्य अशोक रावजी आघावसाहेब नगर परिषद परतूर चे नगरसेवक प्रवीण काका सातोनकर रासपचे शिवाजीराव तरवटे साहेब आणि पत्रकार मित्र दवंडे साहेब, खांडवी येथील प्रथम नागरिक तथा सरपंच गणेश रावजी हरकळ साहेब, खांडवी येथील उत्तमराव वाघमारे रायपूर ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ,माजी सरपंच तसेच ग्रामस्थ व तरुण मोठ्या संख्येने उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गजानन कुकडे सर यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत