सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

नगरपरिषद परतूर मध्ये पाणीपुरवठा विभागाचे तीन तेरा नऊ बारा अभियंता घाटेकर असून अडचण नसून खोळंबा


परतूर / हनुमंत दवंडे
    परतूर नगर परिषद चे पाणी पुरवठा विभाग म्हणजे तमासगीर यांचा खेळ झालेला आहे. पाणीपुरवठा विभागाचे अभियंता घाटेकर यांच्या मनमानी कारभारामुळे शहरातील पाणीपुरवठा कोलमडलेली आहे. घाटेकर हे एक तर ऑफिस मध्ये नसतात त्यांना मोबाईलवर कॉल केल्यावर कॉल घेत नाहीत मोंढा भागातील पाण्याच्या टाकी मागे गेल्या तीन-चार महिन्यांपासून नागरिकांना अर्ध्या भागात पाणी मिळत नाही घाटेकर यांना मोबाईलवर अनेकदा सूचना केल्या असतात दोन दिवसात करतो एक दिवसात करतो असे उडवाउडवीचे उत्तर देतात परत फोन केल्यावर फोन रिसीव्ह करीत नाहीत .बऱ्याच दिवसांपासून या भागातील नागरिक पाण्यामुळे त्रस्त झालेले आहे नागरिकांना विकतचे पाणी घ्यावे लागत आहे जर नागरिकांना विकतच पाणी घ्यायचा असेल तर नगर परिषद पाणी पुरवठा विभागातील अभियंता घाटेकर यांच्यावर का खर्च करत आहे हेच कळत नाही  तसेच नागरीकांनी ही नळपट्टी का भरावी हा प्रश्न निर्माण होत आहे मुख्यअधिकारी यांना फोन लावल्यास त्वरित फोन उचलून संबंधित कर्मचाऱ्यांना पाठवतात परंतु यामधील टेक्निकल प्रॉब्लेम जो आहे तो अभियंता घाटेकर यांनाच माहीत असेल मुख्य  अधिकारी सांगूनही घाटेकर हे काही या विभागाकडे लक्ष देण्यासाठी तयार नाहीत घाटेकर यांना कशाचा माझं चाढलाय हेच कळत नाही अशा संतप्त प्रतिक्रिया नागरिकांतून उमटत आहे घाटेकर कुठल्याही नागरिकांना पत्रकारांना जुमानत नाही कोणाच्याही कॉल रिसीव करत नाहीत आठ-आठ दिवस रस्त्यावर खड्डे करून पाणीपुरवठ्याचे पाईप जोडण्याचे काम चालू असल्याचे भासवत असतात कधीही ऑफिसमध्ये गेल्यास त्यांची बिले काढण्यात व्यस्त असतात त्यांना नागरिकांशी काही घेणं देणं नाही यावरुन असे दिसत आहे .
     तरी प्रशासन वेळेवरच  घाटेकर यांना आवर घालावा नसता संतप्त नागरिकाना रस्त्यावर उत्तरल्या शिवाय पर्याच उरणार नाही 
      या पाणि पुरवठा हा काही मोंढा भागापूरताच वीषय नसून पूर्ण शहरात महीना पंधरा दिवसात काही ना काही समस्या उद्भावतच असतात येत्या  निवडणूकित या पाणि पुरवठा मुळे बऱ्याच जन्नाना नारल मिळणार  असे दिसून येत आहे 
     तरी प्रशासनाने हालचाली करून नागरिकांना वेळेवर पाणीपुरवठा करावा अशी मागनी होत आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत