अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती
परतूर प्रतिनिधी कैलाश चव्हाण अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेअंतर्गत योजनेत देशातील लहान आणि महत्त्वाच्या १२७५ स्थानकांचा विकास करण्यात येणार आहे. सर्व रेल्वे स्थानकांवर रूफ प्लाझा आणि सिटी सेंटर उभारले जातील. या योजनेद्वारे देशातील १००० हून अधिक लहान स्थानकांचे अत्याधुनिकीकरण केले जाणार आहे. यामध्ये परतुर रेल्वे स्थानकाचा देखील समावेश करण्यात आला असून ०६ ऑगस्ट २०२३ रविवार रोजी सकाळी ०९ वाजता कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. देशाचे यशस्वी पंतप्रधान नरेंद्र जी मोदी यांच्या शुभ हस्ते केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या प्रमुख उपस्थितीत व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे या योजनेचा शुभारंभ करण्यात आला. या योजनेअंतर्गत १२ कोटी ०८ लक्ष रुपयांचा निधी उपलब्ध करून देत केंद्र सरकार मार्फत परतुर स्थानकाचा कायापालट केला जाणार असल्याचे प्रतिपादन माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी केले पुढे बोलताना लोणीकर म्हणाले की *मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या रूपाने महाराष्ट्र ट्रिपल इंजिनचे सरकार अस्तित्वात आले अ