सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

जालना जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला आघाडी सहसचिवपदी सौ .उर्मिला खाडे यांची नियुक्ती..=======


परतूर/ हनुमंत दवंडे
परतूर तालुक्यातील आष्टी येथील रहिवासी श्रीमती. उर्मिला सूर्यकांत खाडे यांची दि. 20 जानेवारी रोजी जालना जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या महिला आघाडीच्या सहसचिवपदी एका पत्रकाद्वारे पालकमंत्री राजेश टोपे यांनी जालना येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयात नियुक्ती केली .यावेळी जिल्हा अध्यक्ष डॉक्टर सुरेखा लहाने यांची उपस्थिती होती. यांच्या नियुक्ती निमित्त पालकमंत्री राजेश टोपे जिल्हाध्यक्ष निसार देशमुख प्रदेश, सरचिटणीस बळीराम कडपे, युवकचे जिल्हाध्यक्ष कपिल आकात, तालुकाध्यक्ष रमेश सोळंके, शिवाजी भालेकर राष्ट्रवादी ओबीसी सेल उपाध्यक्ष जालना,  युवकचे तालुकाध्यक्ष ओमकार काटे, महिला आघाडी उपाध्यक्ष पुष्पा मुळे, ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष भागवत चव्हाण, तालुकाध्यक्ष शीला गोरे, सूर्यकांत खाडे, आदींनी अभिनंदन केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत