सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

तुकाराम महाराज यांचे चरित्र हे शब्दामध्ये व्यक्त करणारे चरिञ नाही -ह.भ.प. तुकाराम महराज मुंढे

तळणी ( रवि पाटील ) मी कोण आहे हे कळले पाहीजे यासाठी संत पाहीजे असतात तुकारामची कथा म्हणजे धर्मकथा आहे संत सहवास हा मनुष्य जीवनाचा आधार बनले पाहीजे जगदगुरु तुकाराम महाराज यांचे चरित्र हे शब्दामध्ये व्यक्त करणारे चरिञ नाही तर ते आचरणात आणायसाठी असले पाहीजे तुकोबारायाचे चरित्र हे त्याग निष्ठा आणि समर्पन शिकवते वारकरी सप्रदायामध्ये अनेक अवतारीक पूरुष आहेत असे ऊदगार ह भ प तुकाराम महाराज मुढे परळीकर यानी तळणी येथील अखंड हरीनाम सप्ताह मधील पहील्या दिवशीच्या तुकाराम महाराज चरित्राचे कथन करताना व्यक्त केले 
महापूराषाचे चरिञ हे प्रेरणादाई असतात त्याचे चरित्र आपन आत्मसात केले पाहीजे महापुरुषाचा  भूतकाळ हा आपला वर्तमानकाळ असला पाहीजे छञपती शिवाजी महाराज विरशिरोमणी महाराणा प्रताप वीर सावरकर भगतसीगं राजगूरू सुखदेव सुभाषचंद्र बोस यांची चरीञ आत्मसात करणे सध्या गरजेचे आहे राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहे मानवी जीवनात रामाचे आचरण तर कृष्णाचा विचार सध्याच्या मानवी जिवनात महत्वाचा आहे आणि ते आत्मसात करणे गरजेचे आहे संताकडे चारीत्र्य आहे म्हणून त्यानी चरित्र गहन करून घेतले आहे आजच्या या धावपळीच्या व विज्ञान युगात चारीत्र्य जपणे हे खूप कठीण काम झाले आहे मनुष्याच्या बाबतीत न घडलेल्या गोष्टी सुद्धा चवीने सांगून त्याची हेतूपूरस्कर बदनामी करणाऱ्याची टोळी समाजात सक्रीय .आहे त्या टोळीचा प्रभाव आपल्यावर होऊ द्यायचा नसेल संतसंगाची व भक्ती मार्गाची कास मनुष्याने धरने गरजेचे आहे जगदगूरू . तुकोबारायांच्या काळात सुध्दा अशी अविवेकी प्रवृतीची मानसे होती पण त्या वृत्तीचा साधा स्पर्श सुध्दा तुकोबांरायांना झाला नाही कारण भगवान पांडूरंगांवर असलेली 
बळकट भावना व भक्ती साधनेची एकाग्रताच मंहाराजांना वैकुठाची प्राप्ती करून दीली असे महाराजानी यावेळी उपस्थीताना सांगून मञ मुग्ध .केले 

गेल्या .पंधरा वर्षापासून तळणी  ग्रामस्थ व श्री संत सेवा तरुण मंडळाकडून या सप्ताहचे आयोजन करण्यात येते या वर्षी  या सप्ताहाचे हे सोळावे वर्ष असून सपूर्ण मंठा तालूक्यात प्रसिद्ध सप्ताह म्हणून त्याचा नावलौवकीक आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत