सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तुकाराम महाराज यांचे चरित्र हे शब्दामध्ये व्यक्त करणारे चरिञ नाही -ह.भ.प. तुकाराम महराज मुंढे

तळणी ( रवि पाटील ) मी कोण आहे हे कळले पाहीजे यासाठी संत पाहीजे असतात तुकारामची कथा म्हणजे धर्मकथा आहे संत सहवास हा मनुष्य जीवनाचा आधार बनले पाहीजे जगदगुरु तुकाराम महाराज यांचे चरित्र हे शब्दामध्ये व्यक्त करणारे चरिञ नाही तर ते आचरणात आणायसाठी असले पाहीजे तुकोबारायाचे चरित्र हे त्याग निष्ठा आणि समर्पन शिकवते वारकरी सप्रदायामध्ये अनेक अवतारीक पूरुष आहेत असे ऊदगार ह भ प तुकाराम महाराज मुढे परळीकर यानी तळणी येथील अखंड हरीनाम सप्ताह मधील पहील्या दिवशीच्या तुकाराम महाराज चरित्राचे कथन करताना व्यक्त केले 
महापूराषाचे चरिञ हे प्रेरणादाई असतात त्याचे चरित्र आपन आत्मसात केले पाहीजे महापुरुषाचा  भूतकाळ हा आपला वर्तमानकाळ असला पाहीजे छञपती शिवाजी महाराज विरशिरोमणी महाराणा प्रताप वीर सावरकर भगतसीगं राजगूरू सुखदेव सुभाषचंद्र बोस यांची चरीञ आत्मसात करणे सध्या गरजेचे आहे राम आणि कृष्ण हे पूर्ण अवतार आहे मानवी जीवनात रामाचे आचरण तर कृष्णाचा विचार सध्याच्या मानवी जिवनात महत्वाचा आहे आणि ते आत्मसात करणे गरजेचे आहे संताकडे चारीत्र्य आहे म्हणून त्यानी चरित्र गहन करून घेतले आहे आजच्या या धावपळीच्या व विज्ञान युगात चारीत्र्य जपणे हे खूप कठीण काम झाले आहे मनुष्याच्या बाबतीत न घडलेल्या गोष्टी सुद्धा चवीने सांगून त्याची हेतूपूरस्कर बदनामी करणाऱ्याची टोळी समाजात सक्रीय .आहे त्या टोळीचा प्रभाव आपल्यावर होऊ द्यायचा नसेल संतसंगाची व भक्ती मार्गाची कास मनुष्याने धरने गरजेचे आहे जगदगूरू . तुकोबारायांच्या काळात सुध्दा अशी अविवेकी प्रवृतीची मानसे होती पण त्या वृत्तीचा साधा स्पर्श सुध्दा तुकोबांरायांना झाला नाही कारण भगवान पांडूरंगांवर असलेली 
बळकट भावना व भक्ती साधनेची एकाग्रताच मंहाराजांना वैकुठाची प्राप्ती करून दीली असे महाराजानी यावेळी उपस्थीताना सांगून मञ मुग्ध .केले 

गेल्या .पंधरा वर्षापासून तळणी  ग्रामस्थ व श्री संत सेवा तरुण मंडळाकडून या सप्ताहचे आयोजन करण्यात येते या वर्षी  या सप्ताहाचे हे सोळावे वर्ष असून सपूर्ण मंठा तालूक्यात प्रसिद्ध सप्ताह म्हणून त्याचा नावलौवकीक आहे

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत