सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

महात्मा गांधी चे विचार प्रत्येकानी आत्मसात करावेत...-.खवल.


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे :भारत देशाला स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी महात्मा गांधीजी नी आयुष्य च्या शेवटच्या घटका पर्यंत अहिंसे च्या मार्गाने  प्रयत्न केले त्यांच्या मुळेच आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळाले त्यांच्या विचारांची आजही आपल्याला गरज असल्याचे प्रतिपादन सी. एन. खवल यांनी सांगितले.पाटोदा येथील श्री समर्थ माध्यमिक विद्यालय  आयोजित महात्मा गांधी यांच्या पुण्यतिथी निमित्त कार्यक्रम ते बोलत होते.
           कार्यक्रमा च्या अध्यक्षस्थानी पाराजी रोकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून उद्धव खवल , विदयानंद  सातपुते यांची उपस्थिती होती.
           पुढे बोलतांना खवल म्हणाले कि अहिंसा,असहकार व  स्वावलंबन,या सारख्या बाबी चा विचार करण्याची गरज आजही भासत आहे.
सूत्रसंचालन धनंजय जोशी तर आभार प्रदर्शन पांडुरंग डवरे यांनी केले.
  कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गणेश वखरे ,विष्णू रोडगे, मस्के, केशव गायकवाड यांनी प्रयत्न केले.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत