सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सर्व क्षेत्रात श्रेष्ठ क्षेत्र म्हनुन शिक्षण क्षेत्राची ओळख-कपिल आकातपरतूर-विशाखा राखे याची गैरव समारंभ



परतूर /हनुमंत दवंडे 
सर्व क्षेत्रात श्रेष्ठ क्षेत्र म्हणून शिक्षण क्षेत्राची ओळख आहे आणि या क्षेत्रात ज्यांना सेवा करण्याची संधी मिळते ते खूप भाग्यवान असतात असे उदगार मंगळवारी ता. 25 रोजी आयोजित ला बहादूर शास्त्री कन्या विद्यालयाच्या सह शिक्षिका  विशाखा राखे यांच्या निरोप समारंभ प्रसंगी मराठवाडा सर्वोदय शिक्षक प्रसारक मंडळाचे सचिव कपिल आकात यांनी काढले. या वेळी व्यासपीठावर संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती आशाताई आकात,उपाध्यक्ष कुणाल आकात,माजी नगराध्यक्ष विनायक काळे ,माजी उपनगर अध्यक्ष विजय राखे आदी उपस्थित होते.
                            
                   या वेळी पुढे बोलताना श्री.आकात म्हणाले शैक्षणिक क्षेत्रातुन च भारत देशाचा सुजाण  नागरिक घडवण्याचे कार्य होते. आणि ही संधी शिक्षक वर्गाला मिळते त्यामुळे शिक्षक हा खूप नशीबवान व्यक्ती असल्याचे ते म्हणाले.
 या वेळी श्रीमती विशाखा राखे सेवानिवृत्त झाल्याबद्दल त्यांचा संस्थेच्या वतीने सपत्नीक सत्कार करण्यात आला. या वेळी श्रीमती वर्षाताई आकात, नगरसेवक अंकुश तेलगड,अखिल काजी, प्रा. भारत खंदारे, प्रा.अंकुश मोरे,मा. प्रा. भगवान दिरंगे,सय्यद आरेफ अली,खयूम भाई पठाण,जमील कुरेशी, स्व.बाबासाहेब भाऊ आकात पत संस्थेचे व्यवसथपक शिवाजी ढगे, मुख्यध्यापक संजय जाधव, शाम कबाडी,तुकाराम जईद,रामराव घुगे,रमेश निर्वळ,श्रीमती माधुरी देशपांडे,श्रीधर डोंगरे,राहुल मूजमुले,वैभव बागल आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनिल काळे यांनी केले तर आभार श्रीमती वृन्दा डक यांनी केले.
.....................    ......

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत