सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

तालुका कृषी अधिकारी व्ही. जे. राठोड यांची तळणी मंडळात भेट

 तळणी दि.13(रवी पाटील)तालुका कृषी अधिकारी यांची तळणी मंडळात क्षेत्र भेट झाली दरम्यान तालुका कृषी अधिकारी श्री  व्हीे जे राठोड यांनी मंडळा अंतर्गत मौजे तळणी येथे राबविण्यात आलेल्या बीजोत्पादन कार्यक्रमा अंतर्गत उन्हाळी सोयाबीन , राअसूअ अंतर्गत प्रकल्प भेट , कामगंध सापळे कार्यक्षमता चाचणी क्षेत्र भेट , रब्बी उन्हाळी पीक पाहणी क्षेत्र  भेटी केल्या. 
           दरम्यान प्रकल्पातील जवारी फुले रेवती चे वान चांगले येण्याचे संकेत आढळून आले असून येत्या हंगामात नवीन जवरी बियाणे फुले संगम सारखे प्राप्त होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

           दरम्यान  भाजीपाला बीजोत्पादन नर्सरी उत्पादक शेतकरी श्री अरुण आप्पा सरकटे यांच्या शेतात प्रत्यक्ष भेट देवून टोमॅटो, मिरची, टरबूज,  कांदा इत्यादी बीजोत्पादन कार्यक्रमाची दखल घेतली या सर्व बीजोत्पादन चे माध्यमातून त्यांना प्रती शेडनेट 250000 रुपयाच्या लाभ अपेक्षित असून असे तीन शेडनेट आहेत, सोबत टरबूज पिकाचे २ एकर क्षेत्र असून 8 ते१० लाख रुपयाचे बीजोत्पादन  अपेक्षित आहे. सोबत च कांदा पीक  बीजोत्पादन चे क्षेत्र ३ एकर असून अंदाजे १० लाख रुपये उत्पन्न अपेक्षित आहे. एकूण त्यांना 20 लाखाचे उत्पन्न अपेक्षित असून त्यांची कृषी निष्ट पुरस्कार करिता शिफारस  झाली आहे. ते आपल्या यशाचे श्रेय जिल्हा कृषी अधिकारी, तालुका कृषी अधिकारी , मंडळ कृषी अधिकारी व कृषी सहायक तळणी  यांना देतात .  शेतकऱ्यांनी विविध डीबिटी आणि पोकरा योजना अंतर्गत योजनांचा लाभ घेवून आपले उत्पन्न वाढवावे आणि बीजोत्पादन कार्यक्रमा कडे वळून कमी क्षेत्रात , कमी पाण्यात जास्त उत्पन्न घ्यावे असे आवाहन केले आहे. दोन्ही योजना अंतर्गत शेडनेट करिता अनुक्रमे शासन मार्गदर्शक सूचना चे अधीन राहून अनुक्रमे 50 ते 70 % पर्यंत अनुदान मिळते. सदर भेटी दरम्यान  , कृषी सहायक विजय खोडके, राजू इधोले,कृषी पर्यवेक्षक माऊली नाईक नवरे ,  सिदार्ध खाडे, मंडळ अधिकारी पवार इत्यादी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत