सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

प्रहार संघटनेकडून महाशिवरात्री निमित्त फळे वाटप

 _______________________
परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
 परतूर  येथे प्रहार जनशक्ती पक्ष व प्रहार अपंग संघटनेच्या वतीने परतूर येथील हेमांड पंथी मंदिर  इसवी .सन 16/ 24 चे पुरातन महादेव मंदिर व ग्रामीण रुग्णालय परतुर या ठिकाणी प्रहार जनशक्ती पार्टीचे तालुका उपाध्यक्ष आत्माराम जगताप यांच्या वतीने फळे वाटप करण्यात आली .
           यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे आरोग्य अधिकारी डॉ. सिद्दिकी साहेब प्रमुख उपस्थितीत प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष शिवाजी बप्पा सवणे तसेच जिल्हा निरीक्षक प्रहार अपंग संघटना अशोक तनपुरे व हनुमान  माने माजी जिल्हाध्यक्ष प्रहार अपंग संघटना व प्रहार सेवक शंकर लिंगसे ,रमेश सुरवसे ,प्रकाश तनपुरे ,पत्रकार आढाव ,व शिवभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी सर्वांना फळे वाटप करण्यात आली व सर्वांनी फळाचा आनंद घेतला.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत