सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

परतूर नगर परिषद कडून परतूर दिव्यांग अर्थसाह्य वाटप


..................
परतूर,ता.29 प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
नगर परिषदेच्या वतीने नगरपरिषद अर्थसंकल्पातील एकुण उत्पन्नाच्या पाच टक्के रक्कम दिव्यांग नागरिकांसाठी राखीव ठेवण्यात येते. त्‍यानुषंगाने नगर परिषद परतूरने दिव्‍यांग नागरीकांसाठी .सन 2021-22 या आर्थिक वर्षात 2,45,000/- (दोन लक्ष पंचेचाळीस हजार रुपये केवळ) ची तरतुद केली आहे. परतूर नगर परिषद कार्यालयातील सभागृहामध्‍ये मंगळवारी ता.29 रोजी दिव्‍यांग बांधवांना अर्थसहाय देण्‍यासाठी बोलावण्‍यात आले होते. परतूर नगर परिषद हद्दीत एकूण दिव्यांग लाभधारकांची संख्या 140 असून असून त्‍यापैकी जवळपास 30 ते 35 दिव्‍यांग बंधु-भगिनी उपस्थित होते. 
 उपविभागीय अधिकारी भाऊसाहेब जाधव व माननीय मुख्याधिकारी श्री सुधीर गवळी यांचे हस्ते प्रातिनिधिक स्वरूपात सहा दिव्यांगांना अर्थसहाय्याचे धनादेश वितरित करण्यात आले. उर्वरित दिव्यांगाचे धनादेश आरटीजीएस करून थेट लाभधारकांच्‍या खात्यावर जमा करण्यात येत आहेत. याप्रसंगी माननीय उपविभागीय अधिकारी तथा प्रशासक नगरपरिषद परतुर परतुर यांनी दिव्यांग नागरिकांशी मुक्‍त संवाद साधला व त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. याप्रसंगी माननीय मुख्याधिकारी श्री सुधीर गवळी साहेब यांनी त्यांचे मनोगत व्यक्त करून प्रत्‍येक दिव्‍यांग बांधवांच्‍या अडचणी सोडविण्‍याचा प्रयत्‍न करीन असे सांगीतले.   
याप्रसंगी मा. उपविभागीय अधिकारी श्री भाऊसाहेब जाधव यांचे स्वागत मा. मुख्याधिकारी श्री सुधीर गवळी यांनी केले. तसेच मा. मुख्याधिकारी यांचे स्वागत या कार्यालयाचे कर अधिक्षक श्री चव्हाण यांनी केले.
 या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री एन. आर. दायमा व रामचंद्र पानवाले यांनी प्रयत्‍न केले. या कार्यक्रमास कार्यालयातील कर्मचारी अक्षय पोतदार, आय. एम. शेख, के. टी. सावंत, रवी देशपांडे, संतोष सोनवणे, मुकेश खरात, हरिभाऊ काळे, योगेश काटकर, अनिल पारिख, प्रकाश हिवाळे, शिवाजी गुंजमूर्ती, काळे बाई, राजू बागल, महादेव साबळे, विठ्ठल खंडागळे, फिरोज शेख, दीपक मोरे, महादेव खाटीकमारे इत्यादी कर्मचारी उपस्थित.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत