सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

जय भीम सेना पार्टी, युवा जिल्हा अध्यक्ष (पुर्व) पदी दिपकभाई वक्ते यांची निवड..


.प्रतिनीधी परतूर हनुमंत दवंडे
      /जय भीम सेना महाराष्ट्र प्रदेश, संस्थापक अध्यक्ष मा.सुधाकरभाई निकाळजे.यांच्या नेतृत्वाखाली जय भीम सेनेची स्थापना झाली.मा.सुधाकर भाई निकाळजे हे नेहमी दलीत बहुजनांच्या न्याय हक्कासाठी लढत आहेत.व त्यांना शासन दरबारी न्याय मिळवून देत आहेत.
        त्या अनुषंगाने जिल्ह्यातील अनेक बहुजन बांधव मा.सुधाकरभाई निकाळजे, यांच्या नेतृत्वाखाली काम करण्यास मोठ्या संख्येने जाहिर प्रवेश करत आहेत.जिल्हा अध्यक्ष, पुर्व. डॉ.दिपक भदर्गे.याच्या मार्गदर्शनाखाली,अनेक कार्यकर्त्यांनी प्रवेश घेतला आहे.जय भिम सेना पार्टी ,युवा, जिल्हा अध्यक्ष जालना (पुर्व)दिपक भाई वक्ते यांची निवड करण्यात आली.यावेळी उपस्थित . जिल्हा युवा सचिव पुर्व मा.विनोदजी वाघमारे, महादेव पैठणे,जि.यु.उपाध्यक्ष.परतूर ता.अध्यक्ष.मा.दादासाहेब वाघमारे, मा.उपाध्यक्ष शाहुजी आव्हाड, ओमप्रकाश वाघमारे.ता.कोषाध्यक्ष. परतूर युवा अध्यक्ष मा‌.भारतजी मोरे,युवा उपाध्यक्ष,धूराजी सहजराव,युवा ता.सचिव.शिवाजी रायते, तसेच आष्टी सर्कल युवा.अध्यक्ष.भगवान वाघमारे.सुदर्शन वाघमारे सर.इ.अनेक कार्यकर्त्य उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत