सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

दुकान जळीत प्रकरणी आकात यांनी केली 21 हजारांची मदत


परतूर प्रतिनधी हनुमंत दंवडे
दि.२७ - शॉर्टसर्किटने किराणा दुकानास आग लागून मोठे नुकसान झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल आकात यांनी दुकानदार शेख अयाज यांना 21 हजार 101 रुपयांची आर्थिक मदत केली.यामुळे पीडित दुकानदारास दिलासा मिळाला.
   शहरातील गाव भागातील लड्डा कॉलनीत शेख अयाज यांचे किराणा दुकान आहे.या दुकानावरच शेख यांची उपजीविका चालते.परंतु सोमवारी (दि.25) अचानक शॉटसर्किट होऊन दुकानास आग लागली.क्षणार्धात आग संपूर्ण दुकानात पसरून दुकानातील किराणा सामान जळून खाक झाले.त्यामुळे करावे तरी काय असा प्रश्न शेख यांना पडला.उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने ते हतबल झाले.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कपिल भैया आकात यांच्या कानावर टाकली.आकात यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेख अयाज यांना 21101/- रुपयांची आर्थिक मदत केली. त्यामुळे शेख यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला.
 यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक काळे,नगरसेवक अंकुशराव तेलगड, अखिल काजी,विजय राखे, आरेफ अली, रियाज कुरेशी, कदिर कुरेशी ,रफिक कुरेशी , रज्जाक कुरेशी,नासेर चाउस,अन्वर पठाण , आफरोज सौदागर यांची उपस्थिति होती.
-----------------------------
    ऐन रमजान महिन्याच्या काळातच दुकानाला आग लागल्याने शेख कुटुंब अडचणीत सापडले होते.परंतु कपिल भैया आकात यांनी वेळीच केलेल्या आर्थिक मदतीमुळे या कुटुंबाला निश्चितच दिलासा मिळाला आहे. - विनायक काळे,माजी नगराध्यक्ष, परतूर.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत