सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

दुकान जळीत प्रकरणी आकात यांनी केली 21 हजारांची मदत


परतूर प्रतिनधी हनुमंत दंवडे
दि.२७ - शॉर्टसर्किटने किराणा दुकानास आग लागून मोठे नुकसान झाल्याने राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती कपिल आकात यांनी दुकानदार शेख अयाज यांना 21 हजार 101 रुपयांची आर्थिक मदत केली.यामुळे पीडित दुकानदारास दिलासा मिळाला.
   शहरातील गाव भागातील लड्डा कॉलनीत शेख अयाज यांचे किराणा दुकान आहे.या दुकानावरच शेख यांची उपजीविका चालते.परंतु सोमवारी (दि.25) अचानक शॉटसर्किट होऊन दुकानास आग लागली.क्षणार्धात आग संपूर्ण दुकानात पसरून दुकानातील किराणा सामान जळून खाक झाले.त्यामुळे करावे तरी काय असा प्रश्न शेख यांना पडला.उपजीविकेचे दुसरे साधन नसल्याने ते हतबल झाले.राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी ही बाब राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कपिल भैया आकात यांच्या कानावर टाकली.आकात यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन शेख अयाज यांना 21101/- रुपयांची आर्थिक मदत केली. त्यामुळे शेख यांच्या कुटुंबियांना मोठा दिलासा मिळाला.
 यावेळी माजी नगराध्यक्ष विनायक काळे,नगरसेवक अंकुशराव तेलगड, अखिल काजी,विजय राखे, आरेफ अली, रियाज कुरेशी, कदिर कुरेशी ,रफिक कुरेशी , रज्जाक कुरेशी,नासेर चाउस,अन्वर पठाण , आफरोज सौदागर यांची उपस्थिति होती.
-----------------------------
    ऐन रमजान महिन्याच्या काळातच दुकानाला आग लागल्याने शेख कुटुंब अडचणीत सापडले होते.परंतु कपिल भैया आकात यांनी वेळीच केलेल्या आर्थिक मदतीमुळे या कुटुंबाला निश्चितच दिलासा मिळाला आहे. - विनायक काळे,माजी नगराध्यक्ष, परतूर.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत