सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शेतकऱ्यांच्या गुणवंत मुलींचा सत्कार संम्पन

परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
बळीराजा करिअर अकॅडमी,खरपुडी जि. जालना या संस्थेच्या वतीने ई. 11 व 12 वी च्या विद्यार्थ्यांना मोफत निवासी कोचिंग क्लास घेण्यात येणार आहेत. यामध्ये NEET, JEE, MHCET या स्पर्धा परीक्षेची तयारी करून घेण्यात येणार आहे. त्यासाठी या संस्थेने जालना जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची प्रवेश परीक्षा घेतली होती. 
           या कठीण असलेल्या परीक्षेत आनंद माध्यमिक विद्यालय परतूर च्या विद्यार्थिनी झाशी राजेभाऊ जगताप , श्रावणी राजकुमार तांगडे , पूजा भारत मंडपे या उत्तीर्ण झाल्या. त्याबद्दल शाळेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी शिक्षक प्रशांत वेडेकर , अनुसया गारकर , विक्रम भांडवलकर यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमा च्या अध्यक्ष स्थान राजकुमार तांगडे यांनी भूषविले तर प्रमुख पाहुणे म्हणून राजेभाऊ जगताप , एकनाथ कदम उपस्थित होते. आपल्या अध्यक्षीय भाषणात राजकुमार तांगडे म्हणाले की, मुलीच्या यशस्वीते बद्दल आई-वडिलांचा सत्कार होणे याचे मोल होऊ शकत नाही.या यशाचे श्रेय शिक्षक व मुलींचे आहे. यामुळे शाळेच्या गुणवत्तेवर शिक्कामोर्तब झाले. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन व आभार प्रदर्शन मुख्याध्यापक संजय कदम यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत