सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

विकास कोरडे यांची नायब तहसीलदार बीड पदी निवड झाल्याबद्दल सन्मान करताना प्रकाश सोनसळे (धनगर समाज नेते महाराष्ट्र राज्य व सहकारी )

बीड प्रतिनिधी हनुमंत दंवडे

 आज बीड येथे मा. विकास कोरडे साहेब यांची बीड तालुका नायब तहसीलदार पदी निवड झाल्याबद्दल त्यांचा सन्मान करण्यात आला‌.
यावेळी प्रकाश भैय्या सोनसळे धनगर समाज नेते महाराष्ट्र, डॉ.संतोष महानोर, नारायण भोंडवे, शीतल मतकर, पवन गावडे, प्रजित भोंडवे, बाळासाहेब गावडे, राहुल ठेंगल, विजय घोंगडे, महादेव सातपुते ,श्याम गाडेकर,काशीद मामा, सखाराम गोरे, विशाल प्रभाळे, मयुर खोमणे, योगेश केसकर , कृष्णा पितळे सरपंच, अविनाश बारणे,सुरेश देवडे, नारायण धापसे, महादेव हजारे, ग्रामसेवक ,ज्ञानेश्वर देवकते पोलीस, उपनिरीक्षक, कोकाटे सूर्यकांत , साईनाथ गावडे, सुधाकर वैद्य,शिवराम शिरगिरे, खांडेकर भैय्या ,परमेश्वर तागड, वैद्य सर,गुरव भैय्या, आजीनाथ भोंडवे,रूषीकेश भोंडवे, भाऊसाहेब भोंडवे, विश्वजीत ससाने ,अमर भोंडवे,आदींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा संपन्न झाला.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत