सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

आदर्श कॉलनी ते शिवाजीनगर रोड चे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून काम नव्याने करण्यात यावे या मागणीसाठी नागरिकांचे नगरपरिषद परतुर यांना निवेदन सादर.


परतूर प्रतिनिधी हनुमंत दवंडे
आदर्श कॉलनी येथील सिमेंटचे रोडचे काम गेल्या चार महिन्यापूर्वी करण्यात आले होते. त्यामध्ये सिमेंट अत्यंत बोगस पद्धतीने वापरून निकृष्ट दर्जाचं काम करण्यात आलेले आहे अशा तक्रारी नागरिकांनी केलेल्या आहेत कारण की सिमेंट रस्ता झाल्यानंतर त्यावरून जड वाहनांची वाहतूक पूर्णता झाली असल्यामुळे रोडवरील खडीचे दगड आहे उडून नागरिकांना अपघात झाल्याच्या काही घटना घडलेल्या आहेत. तसेच सीमेंट रोड हा पूर्णता खीळ खीळ झाला आहे .बोगस सिमेंट वापरून निकृष्ट दर्जाचे काम आदर्श कॉलनी रोडचे करण्यात आलेली आहे याची ही वरिष्ठांनी चौकशी केली पाहिजे व तो सिमेंट रस्ता तात्काळ दुरुस्त करून देण्यात यावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना महिला आघाडीच्या वतीने कॉलनीतील नागरिकांच्या वतीने नगरपरिषद कार्यालय परतुर यांना देण्यात आलेले आहे. व निवेंदना वरील सह्या 
कुंताबाई भुसारे शिवसेना महिला आघाडी परतुर, प्रज्ञा जगताप, प्रियांका जवळकर, गीता भारस्कर ,सुशिलाबाई शिंदे, उर्मिला राऊत, वेणू राऊत, आशा राऊत ,अश्विनी आवटे ,रोशनी खरे, मंडोदरी शिंदे, गौरव डहाळे, संगीता नाचणे ,जयश्री मुजमुले, जिजाबाई मस्के, संजय खरात, गंगाधर शिंदे ,मुक्ता गायकवाड, शंकर डहाळे ,निर्वळ सर, अनिल खरात ,आसाराम म्हस्के, मामा भांजे, दीपक पुरी, अभिषेक राऊत ,प्रथमेश राऊत ,अक्षय खरात, यावेळी यांची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत