सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

परतूर येथे वंचित बहुजन आघाडीची महत्वपूर्ण बैठक संपन्न.


प्रतिनिधी हनुमंत दवंडे
 परतूर येथे वंचित बहुजन आघाडी ची बैठक घेण्यात आली. वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष भालचंद्र भोजने यांच्या अध्यक्षतेखाली व जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका महासचिव रवींद्र भदर्गे यांच्या नेतृत्वाखाली परतुर तालुक्यातील जिल्हा परिषद ,पंचायत समिती, व नगर परिषद येणाऱ्या निवडणुकीच्या संदर्भात आढावा बैठक घेण्यात आली 
     .यावेळी उपस्थित जिल्हा अध्यक्ष भालचंद्र भोजने जिल्हा उपाध्यक्ष सतीश खरात जिल्हा सचिव राहुल नाटकर जिल्हा उपाध्यक्ष रोहन वाघमारे, बाबू गोसावी वंचित बहुजन आघाडी ता. अध्यक्ष, अच्युत पाईकराव तालुका महासचिव, रविंद्र भदर्गे तालुका उपाध्यक्ष ,शोएब पठाण कोषाध्यक्ष ,रतन शिरसाठ, प्रकाश मस्के ,जमीर शेख, सिद्धार्थ पाणवाले ,कृष्णा पाईकराव, मनोज वंजारे आदींची उपस्थिती या बैठकीला होती.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत