सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

निखिल रामराव साबळेयांचा पीएच.डी.पदवी प्राप्त केल्या बद्दल सत्कार .



परतूर प्रतीनीधी हनमंत दंवडे
येथील निखिल रामराव साबळे यांनी पदार्थ विज्ञान शास्त्र या विद्या शाखेत नुकतिच शिक्षण क्षेत्रातील पीएच. डी.ही सर्वोच्च पदवी संपादन केली.
        त्यांच्या या यशाबद्दल श्री पतंजली आयुर्वेद व पंचकर्म क्लिनिकच्या वतीने माजी जिल्हा परिषद सदस्य अशोकराव बरकुले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
         निखिल साबळे यांनी " अ स्टडी ऑफ क्रिस्टलाईन सॉलीड मटेरियल अॅण्ड इट्स ऍप्लीकेशन्स "
या विषयात डाॅ.किशोर गोपाळराव चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मलवांचल युनिव्हर्सिटी इंदोर येथे संशोधन प्रबंध सादर केला होता. निखिल साबळे यांना या संशोधन कार्याबद्दल पीएच.डी.ही पदवी विद्यापीठाने बहाल केली.
    निखिल साबळे  
यांचे पीएच.डी.पदवी प्राप्त केल्यासर्वत्र कौतुक होत आहे.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत