सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

दैनंदिन जीवनाशी गणिताचा संबंध जोडल्यास गणित विषय सोपा- डॉ. प्रज्ञानकुमार भोजनकर ,आनंद विद्यालयात संपन्न झाली गणित विषयाची कार्यशाळा


प्रतिनिधी / परतूर हनुमंत दवंडे :
        दैनंदिन जीवनात सकाळ पासून संध्याकाळ पर्यंत अनेक घटनांच्या माध्यमातून गणिताचा संबंध आलेला आपल्याला पाहायला मिळते.गाणितातील आकडेमोडीची भीती मनात न बाळगता, गणिताशी बोला, त्याच्याशी मैत्री करा, गणित तुम्हाला आपलेले करील असे मत महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळाचे सदस्य डॉ. प्रज्ञानकुमार भोजनकर यांनी व्यक्त केले आहे. येथील आनंद माध्यमिक विद्यालयात गणित विषयासंदर्भात विशेष कार्यशाळेचे आयोजन सोमवारी करण्यात आले होते. गणित विषयाची विद्यार्थ्याना वाटणारी भीती आणि त्यावरील उपाययोजना या विषयावर मार्गदर्शन करतांना डॉ. भोजनकर बोलत होते. यावेळी शिवछत्रपती शिक्षण व क्रीडा मंडळाचे अध्यक्ष एकनाथ कदम, मुख्याध्यापिका सत्याशिला तौर-कदम यांची प्रमुख उपस्थिती होती गणित विषय विद्यार्थ्यांच्या विचारशक्तिला चालना देणारा, बौद्धिक विकासाला प्रोत्साहन देणारा विषय आहे. गणितात अनेक गमतीशीर बाबी समजून घेतल्यास विषय कंटाळवाणा न होता गमतीशीर होऊ शकतो. गणितातबाबतचा न्यूनगंड बाजूला ठेवून नवीन गोष्टी आत्मसात करण्यासाठी गणिताचे अध्ययन केल्यास हा विषय समजण्यास सोपा होईल. शिक्षकांनी देखील गणिताचे अध्यापन करतांना विविध अध्यापन पद्धतींचा अवलंब करून गणिता बद्दल विद्यार्थ्याच्या मनात आवड निर्माण करण्याचा प्रयत्न करावा.जागतिक स्तरावर गणित विषयावर होणारी विविध संशोधने, प्रसिद्ध होणारे शोधप्रबंध या बाबत गणित शिक्षकाने सजग असले पाहिजे असे पुढे बोलतांना डॉ. भोजनकर म्हणाले. विविध गणिती क्रिया करतांना वापरण्यात येणाऱ्या सोप्या पद्धतींची प्रात्यक्षिके यावेळी त्यांनी विद्यार्थ्याना करून दाखविली. विद्यालयातील माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यानी या कार्यशाळेत उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला. यावेळी मुख्याध्यापक संजय कदम, शिक्षक माऊली ढेरे, विक्रम भांडवलकर, अनुजा गारकर, उदिता उपाध्याय आदींची उपस्थिती होती.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत