सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सय्यद वसीम व मित्र मंडळाच्या वतीने पालिकेतील सफाई कामगारांचा सत्कार....


परतूर/प्रतिनिधी हनुमंत दवंडे

अनेक वेळा चांगले कार्य करणाऱ्या कामगारांचा गौरव झालेले तसे कमी पाहण्यात येथे  याला अपवाद आहे शहरातील एआईएमआयएम चे शहराध्यक्ष सय्यद वसीम यांच्या वतीने शहराची साफसफाई करणाऱ्या पालिका कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला.
झाले असे की मागील आठवड्यात आषाढी एकादशि व बकरी ईद हे महत्वाचे सण साजरे करण्यात आले या सणाच्या काळात शहरातील विविध भागांतील स्वच्छता करून आपल्या कर्तृत्वाची झलक दाखवून देणाऱ्या पालिका कर्मचारी यांनी मुख्याधिकारी सुधीर गवळी व स्वच्छता अभियंता प्रमोद घाटेकर ,निरीक्षक रवी देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली साफसफाई केली 
याबाबत नागरिकांमधून समाधान व्यक्त करण्यात आला होता याबाबतची दखल घेत सय्यद वसीम व त्यांच्या मित्रमंडळी यांनी दिनांक 17 जुलै रोजी पालिकेत जाऊन सफाई कामगार यांचा सत्कार केला 
यावेळी सय्यद रहेमान,इसा अन्सारी,नईम भाई,शेख हसन,रज्जाक कुरेशी,नजीब काजी,शेख आसेफ,अनिल पारीख यांच्यासह पालिकेतील सफाई कामगार व अन्य कर्मचारी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत