सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

जिल्हा_परिषद_शाळा_वाढोणा येथील विद्यार्थ्याचे नवोदय परीक्षेत घवघवीत यश....

====================
परतूर प्रतिनिधी/हनुमंत दवंडे
परतुर तालुक्यातील वाढोना येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केले आहे.
 कु_अनुजा_अच्युत_शेळके, कु.अक्षरा गोपाळ तनपुरे या दोन मुलीनी घवघवीत येश संपादन केलेआहे. त्या विद्यार्थ्याचे परतूर तालुक्यातील व गावातील गावकऱ्यांकडून व शिक्षकाकडून त्यांच्यावर कौतुकांचा वर्षाव केला जात आहे खऱ्या अर्थाने या यशामागे शिक्षकांनी घेतलेली खरी मेहनत याचे फळ विद्यार्थ्याला मिळाले आहे. तसेच कोणतीही गोष्ट 
 शिक्षकाने मनावर घेतली व वेळ दिला तर शाळेचा नावलौकिक होतो .शाळा हे माझे दैवत आहे. या भूमिकेतून शाळेच्या विद्यार्थ्यांसाठी कायम तत्पर असणारे ' शिक्षक तथा मु.अ . श्री. राजेश लोखंडे ,श्री विनायक भिसे तसेच श्री संजय कासतोडे यांच्या वाढोणा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतून दोन विद्यार्थ्यांनी घवघवीत यश संपादन केलेले आहे ही पावती शिक्षकांची मेहनत आणि शेतकरी कुटुंबातील मुलींच्या कष्टाचे फळ आहे . 
 शाळे मधील दोन विद्यार्थ्यांनी नवोदय विद्यालयाच्या परीक्षेमध्ये घवघवीत यश संपादन केलेले आहे . गतवर्षी तीन विद्यार्थी आणि यावर्षी दोन विद्यार्थी यांनी नवोदय परीक्षेमध्ये यश संपादन केलेले आहे खरंतर ही मुले शेतकऱ्याची लेकरं नवोदय विद्यालयाला पात्र केली आहेत , त्यासाठी यांचे जे कष्ट आहेत निश्चितच त्यांचा सन्मान केला पाहिजे आणि ते सन्मानाला पात्र आहेत , या बद्दल शालेय व्यवस्थापन. समीतीचे अध्यक्ष श्री. नागेश तनपुरे व उपाध्यक्ष श्री. विजय शेळके तसेच समीतीचे सर्व सदस्य व सरपंच श्री. सुरेश शेळके व सर्व ग्रा. पंचायत सदस्य व गावकरी यांनी विध्यार्थी तसेच त्यांचे पालक व सर्व शिक्षकाचे आभिनंदन केले .
 व पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत