सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

शेतकर्‍या साठी नेहमी झटणारे आमदार बबनराव लोणीकर यांना मंत्रिमंडळात स्थान द्या- अरुण खराबे पाटील.


मंठा प्रतिनिधी सुभाष वायाळ
मंठा येथील अरुण खराबे पाटील यांनी परतूर मंठा मतदार संघाचे विद्यमान आमदार बबनरावजी लोणीकर यांना मंत्रिमंडळामध्ये परत एकदा मंत्री मंडळामध्ये स्थान देण्याची मागणी केली आहे गेल्या अडीच वर्षांपूर्वी देवेंद्र फडवणीस यांच्या सरकारमध्ये विद्यमान आमदार बबनराव लोणीकर यांच्याकडे महाराष्ट्र राज्याचे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री म्हणून जबाबदारी देण्यात आलेली होती. ही जबाबदारी बबनराव लोणीकर साहेब यांनी संपूर्ण महाराष्ट्रात अत्यंत प्रभावीपणे पार पाडून पाणीपुरवठा योजनेच नातं जिवंत करण्याचे काम त्यांच्या हातून झालेला आहे 
    सतत दुष्काळात भरपळत असलेला मराठवाडा यासाठी कायमस्वरूपी उपाय म्हणून मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी महत्त्वकांक्षी योजना आणून मराठवाडा दुष्काळमुक्त करण्यासाठी खूप मोठे प्रयत्न त्यांनी केले असून परतूर मंठा तालुक्यात आमदार बबनराव लोणीकर यांच्या हातून विविध विकास कामे झालेली आहेत.तसेच नेहमी शेतकरी, कष्टकरी साठी आ. लोणिकर हे प्रयन्तशिल आसतात प्रत्येकाच्या सुखदुःखाला हजर असणाऱ्या व चार ते पाच वेळा विधानसभा निवडणूक जिंकून आलेले आमदार बबनराव लोणीकर यांचा पुन्हा एकदा मंत्री मंडळात समावेश व्हावा याकरीता मंठा तालूक्याततिल हेलस या गावा मधे श्री संत बोडखे महाराज यांनी जीवंत समाधी घेतली होती अरुण खराबे पाटील यांनी श्री संत बोडखे महाराज यांच्या चरणि प्रार्थना केली आहे की मा. आ. बबनराव लोणीकर यांना मंत्रीमंडळात स्थान मिळावे तसेच परतुर मंठा मतदार संघातील तमाम जनतेची मागणी असल्याचे अरुण खराबे पाटील यांनी सांगितले..

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत