सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

लोणीकरांचा दणका - जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर तात्काळ पंचनाम्यांना, उपमुख्यमंत्र्यांची भेट घेऊन लोणीकरांनी पत्राद्वारे केली पिकांच्या नुकसान भरपाईची मागणी,लोणिकरच्या सुचनेनंतर व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे जिल्हाधिकाऱ्यांच्या तहसीलदारांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना

प्रतिनिधी  जालना समाधान खरात 
मराठवाड्यासह जालना जिल्ह्यात अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती निर्माण झालेली असताना प्रशासनाच्या वतीने मात्र अतिवृष्टी नाही या विचाराने कोणत्याही प्रकारचे पंचनामे करण्याचे टाळले होते परंतु मागील 20 ते 22 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याकारणाने मराठवाड्यासह जालना जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांच्या पिकांचे 50% पेक्षा अधिक नुकसान झाले आहे काल माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जालना जिल्हाधिकारी डॉ विजय राठोड यांना फोनवरून तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले असून लोणीकरांच्या सूचनेनंतर तात्काळ पंचनाम यांना सुरुवात झाली आहे

प्रत्यक्षात अतिवृष्टी झालेली नसेल तरीदेखील शेतकऱ्यांचे 33% पेक्षा अधिक नुकसान झाले असेल तर प्रशासकीय पातळीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशान्वये पंचनामे करण्याची तरतूद कायद्यानुसार आहे ही बाब लोणीकरांनी जिल्हाधिकाऱ्यांना सुचवल्यानंतर प्रशासनाने नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्यास सुरुवात केली आहे मागील 20 ते 22 दिवसापासून सतत मराठवाडा सह जालना जिल्ह्यात पाऊस सुरू असून अतिवृष्टी नसली तरी देखील पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली आहेत त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे तात्काळ पंचनामे करून त्यांना नुकसान भरपाई मिळावी यासाठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रत्यक्ष भेट घेऊन पत्राद्वारे लेखी मागणी केली आहे

परतुर विधानसभा मतदार संघातील मंठा तालुक्यात सरासरी 602 मिलिमीटर पाऊस पडला असून तालुक्यातील चार मंडळांपैकी मंठा 537 मिलिमीटर तळणी 608 मिलिमीटर डोसा 510 मिलिमीटर तर पांगरी गोसाई मंडळात 747 मिलीमीटर सरासरी पाऊस पडल्याची नोंद आहे. परतुर तालुक्यात 535 मिलिमीटर पडला असून त्यातील परतूर मंडळात 194 मिलिमीटर वाटूर मंडळात 175 मिलिमीटर आष्टी मंडळात 78 मिलिमीटर सृष्टी मंडळात 99 किलोमीटर तर सातोना मंडळात 95 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्याचप्रमाणे जालना तालुक्यात सरासरी 585 मिलिमीटर पाऊस पडला असून परतूर विधानसभा मतदारसंघातील नीर मंडळात 507 तर सेवली मंडळात 552 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे अतिवृष्टी झालेली नसली तरी देखील मागील 20 ते 22 दिवसांपासून सतत पाऊस सुरू असल्याकारणाने अनेक शेतकऱ्यांची पिके उध्वस्त झाली आहेत त्या संदर्भातील नुकसान भरपाई साठी माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याची मागणी केली आहे

*लोणीकरांच्या सूचनेनंतर जिल्हाधिकाऱ्यांची व्हिडिओ कॉन्फरन्स*
अतिवृष्टी किंवा सततच्या पावसामुळे किंवा कोणत्याही कारणाने 33% पेक्षा अधिक पिकांचे नुकसान झाले असेल तर त्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना आहेत अशी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी जिल्हाधिकाऱ्यांना सूचना केल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी व्हिडिओ कॉन्फरन्स द्वारे महसूल प्रशासनाची तात्काळ बैठक घेऊन तहसीलदारांसह इतर अधिकाऱ्यांना तात्काळ पंचनामे करण्याच्या सूचना दिल्या तत्पूर्वी मात्र अतिवृष्टी झालेली नाही असे गृहीत धरून पंचनामे करण्याची गरज नाही असाच समज प्रशासनाचा होता

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत