सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

कमी पावसामुळे पिकांचे नुकसान, जायकवाडी धरणाचे चे पाणी डाव्या कालव्यात सोडा - माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांची मागणी,डाव्या कालव्यात पाणी सुटल्यास परतूर, घनसावंगी व अंबड तालुक्यातील शेतकऱ्यांना होणार लाभ - लोणीकर यांची माहिती,अधीक्षक अभियंता, लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) यांच्याकडे पत्राद्वारे लोणीकर यांनी केली मागणी

जालना प्रतिनिधी समाधान खरात 
परतुर अंबड व घनसावंगी या तालुक्यामध्ये खूप कमी प्रमाणात पाऊस पडल्यामुळे पिकांचे पाण्यावाचून अतोनात नुकसान होत असून पीके करपुन जात आहेत. त्यामुळे जायकवाडी च्या डाव्या कालव्यात तात्काळ पाणी सोडण्यात यावे अशी मागणी माजीमंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी अधीक्षक अभियंता  लाभक्षेत्र विकास प्राधिकरण (कडा) यांच्याकडे केली आहे.

त्यामुळे जालना जिल्ह्यातील परतूर, अंबड व घनसावंगी या तालुक्यातील शेतीचा विचार करता जायकवाडी धरणाच्या डाव्या कालव्यात पाणी सोडणे आवश्यक आहे. पाणी सुटल्यास परतूर घनसावंगी व अंबड या तिन्ही तालुक्यातील शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात लाभ होणार आहे अशी माहिती माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात दिली

परतुर घनसावंगी व अंबड या भागामध्ये अत्यल्प वृष्टी झाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील सोयाबीन कापूस तूर मूग उडीद तत्सम पिके सुकू लागलेली आहेत या बाबीमुळे शेतकरी अडचणीत सापडला असून घरातील दागदागिने विकून, बँकातील कर्ज काढून यावर्षी पेरणी केली आहे असेही लोणीकर यांनी पत्रात नमूद केले आहे 

या हंगामाच्या सुरुवातीला सर्वत्र पाऊस होत होता मात्र या भागांमध्ये पावसाच्या तुरळीक सरी कोसळल्यामुळे जोमातील पिके कोमोजू लागली आहेत त्यामुळे शेतकऱ्यांनी त्यामुळे शेतकऱ्यांना त्यांचे पिके जतन करण्यासाठी पाण्याची आवश्यकता असून डाव्या कालव्यात पाणी सोडल्यास निश्चितपणाने या भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या शेतातील धन जोपासण्यासाठी मदत होणार आहे त्यामुळे जायकवाडी प्रकल्पाचे पाणी डाव्या कालव्यात सोडण्यात यावे करिता माजी मंत्री आमदार बबनराव लोणीकर यांनी पत्राद्वारे मागणी केली आहे..!!

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत