सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

राशन कार्ड साठी सर्वसामान्यांची आर्थिक पिळवणूक होत असल्याने तहसीलदार यांना निवेदन सादर...


परतुर प्रतिनिधी हनुमंत दवंडे 
परतुर येथील तहसील कार्यालयामध्ये अनेक सर्वसामान्य लोक राशन कार्ड साठी येत असतात अनेक वर्षापासून फाईल प्रलंबित आहेत राशन कार्ड साठी ये जा करून सर्वसामान्य लोकांचा जीव मेटकुटीलाआलेला आहे. 
       नायब तहसीलदार पुरवठा विभाग यांच्याकडे याचे काम आहे यांच्याकडे अनेक लोक राशन कार्ड च्या तक्रारी घेऊन येतात त्या तक्रारीचे योग्य दिशेने निराकरण होत नाही त्यासंदर्भात विचारणा केली असता हे सांगतात की आमच्याकडे याचा अतिरिक्त पदभार दिलेला नाही अशी उडवा उडवी चे उत्तर नायब तहसीलदार नेहमी लोकांना देत असतात. एजंटच्या माध्यमातून राशन कार्ड देण्याचे काम तहसील विभागांमध्ये सुरू आहे हे एजंट कोण आहेत. यांच्याकडे कोणता पदभार आहे .या सर्व प्रकाराची चौकशी करून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी एका निवेदनाद्वारे बेजबाबदार नायब तहसीलदार  यांना कार्यमुक्त करण्याची मागणी सन ऑफ आंबेडकर ग्रुपचे सनी गायकवाड यांनी केली आहे

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत