सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

सद्गुरू संत श्री सेवालाल महाराजांचे जीवन कार्य प्रत्येकाने अंगीकारावे - भाजपा युवा मोर्चा प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांचे प्रतिपादन


परतूर प्रतिनिधी कैलास चव्हाण 
      प्रत्येकाच्या आयुष्यात संतांची शिकवण मार्गदर्शक ठरत असते प्रत्येक व्यक्तीने आपली स्वतःची ओळख निर्माण करून स्वतःसह समाजाच्या विकासासाठी हातभार लावावा त्यासाठी संत सद्गुरू सेवालाल महाराज यांचे जीवन कार्य प्रत्येक व्यक्तीने अंगीकारावे असे प्रतिपादन भाजपा युवा मोर्चाचे प्रदेश महामंत्री राहुल लोणीकर यांनी आज केले.
मंठा तालुक्यातील कर्णावळ येथे संत सद्गुरू सेवालाल महाराज यांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम प्रसंगी श्री राहुल लोणीकर बोलत होते यावेळी मंचावर महंत योगानंद महाराज,
गणेशराव खवणे, सतीश निर्वळ, पंजाबराव बोराडे, राजेश मोरे, नागेश घारे, सुभाष राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

संतांच्या सानिध्यात मोक्ष आणि सद्गती प्राप्त होते त्यामुळे उपदेशाप्रमाणे आपले जीवनकार्य चालवावे त्यासोबतच समाजासह गावाच्या विकासावर देखील भर द्यावा संतांनी महंतांच्या सूचनांचे पालन करावे त्याशिवाय तरणोपाय नाही असेही यावेळी राहुल लोणीकर यांनी स्पष्ट केले.

सत्संगतीचा महिमा अपार आहे. सत्संगतीने आपल्या सद्बुद्धीत वाढ होते. यासाठी संतांची संगती करायला शास्त्रात आग्रहपूर्वक सांगितले आहे. संताचा प्रत्यक्ष सहवास मिळाला तर उत्तमच संतसंगतीमुळे आत्मज्ञानाची तळमळ शांत होण्यास मदत होते तसेच संतांच्या संगतीने आध्यात्मिक प्रगती साधता येते. त्यासाठी प्रत्येकाने सदगुरू संत श्री सेवालाल महाराज यांच्या जीवनकार्य अंगिकरावे असेही राहुल लोणीकर यावेळी म्हणाले.

यावेळी उद्धव पवार, अविनाश चव्हाण, नागेश घारे, विठ्ठलराव काळे, प्रसादराव बोराडे, माऊली गोंडगे, विलास घोडके, राजेभाऊ खराबे, सुभाषराव बागल, नवनाथ चट्टे, मनोज देशमुख, ज्ञानेश्वर राठोड, भगवान राठोड, कैलास चव्हाण, भीमराव राठोड, नायबराव गोंडगे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती...

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत