सोनल नगरमध्ये पहिल्याच पावसात नाले तुंबले; पाणी घरांमध्ये शिरल्याने नागरिक त्रस्त

Image
जालना प्रतिनिधी समाधान खरात  जालना शहरातील सोनल नगर परिसरात आज सकाळी झालेल्या पहिल्या पावसानेच नागरी सुविधांच्या दाव्यांची पोलखोल झाली. परिसरातील नाल्यांची नियमित स्वच्छता न झाल्याने पावसाचे पाणी नाल्यातून वाहून न जाता रस्त्यावर तुंबले. त्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले असून नागरिकांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागले. तुंबलेल्या पाण्याचा निचरा न झाल्याने ते थेट नागरिकांच्या घरांमध्ये शिरले. महिलां व ज्येष्ठ नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागला. पहिल्याच पावसात अशी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. स्थानिक नागरिकांनी अनेक वेळा नाल्यांची स्वच्छता व दुरुस्ती करण्याची मागणी केली होती.तसेच या सोनल नगर मध्ये ज्या गुत्तेदाराने काम केले आहे ते चुकीच्या पद्धतीने केले असल्याचे निवेदन महानगर पालिका प्रशासनास वेळोवेळी देऊन सुद्धा प्रशासनाने त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. पावसाळ्याच्या सुरुवातीलाच ही अवस्था निर्माण झाल्याने पुढील काळात मुसळधार पाऊस झाल्यास परिस्थिती आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त केली...

पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या लक्ष्मण नवले यांना सर्वाधिक मतांनी विजयी करा:- सचिन खरात,स्व.विनायकरावजी मेटे साहेबांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी लक्ष्मण नवले यांना प्रथम क्रमांकाची पसंती द्या :-सचिन खरात


 परतुर (प्रतिनिधी) कैलाश चव्हाण 
डॉ‌.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ आधिसभा (सिनेट) निवडणूक 2022 साठी एकूण दहा जागेपैकी पाच जागा खुल्या वर्गासाठी आरक्षीत आहेत.*परिवर्तन पॅनलचे श्री. लक्ष्मण उत्तम नवले यांनी खुल्या वर्गातून उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे
       .पदवीधरांच्या न्याय हक्कासाठी लढणारे *शिवसंग्राम चे उमेदवार लक्ष्मण उत्तम नवले* हे विद्यापीठाशी निगडित अडीअडचणीत बाबतीत सदैव तत्पर असून स्व.विनायकराव मेटे साहेबांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी नेहमीच विद्यार्थ्यांचे हित बघितलेला आहे मेटे साहेबांच्या माध्यमातून सदैव विद्यापीठाचे प्रश्न व विद्यार्थीच्या अडचणी ते सोडवण्याचा काम केलेला आहे त्याच प्रमाणे काम करत आहेत *परिवर्तन पॅनलचे समन्वयक खंदारे सर* यांच्या मार्गदर्शनाखाली खुल्या प्रवर्गातून सर्व समाजातील विविध क्षेत्रातील विद्यार्थ्यांचे प्रश्नावर आक्रमक भूमिका घेऊन सर्व विद्यार्थ्यांचा न्याय मिळवून देण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न ते सदैर करत आले आहेत. विद्यार्थ्यांची हालाखीची परिस्थिती त्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी *मतदार बंधू बहिणींनो प्रा. लक्ष्मण उत्तमराव नवले यांना पहिल्या पसंतीचे मतदान देऊन त्यांच्या पाठीमागे उभे राहावे असे आव्हान सचिन खरात यांनी केले आहे*

Comments

Popular posts from this blog

"संतांच्या कृपेनेच दानाची वृत्ती निर्माण होते"-भ.प. विशाल महाराज खोले

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत