सातोना खुर्द येथील शालेय समितीची निवड रद्द करून फेरनिवडणुकीची पालकांची मागणी

 सातोना प्रतिनिधी सुरेश लहाने जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, सातोना खुर्द (ता. परतूर) येथे नुकत्याच झालेल्या शालेय व्यवस्थापन समितीच्या निवडीवर पालकांनी आक्षेप घेत निवड प्रक्रिया रद्द करून मतदानाद्वारे फेरनिवडणूक घेण्याची मागणी केली आहे. यासंदर्भात पालकांनी मुख्याध्यापकांकडे निवेदन सादर केले आहे. निवेदनात म्हटले आहे की, दि. २७ जुलै २०२६ रोजी शालेय समिती सदस्यांची निवड करण्यात आली. मात्र, बैठकीची वेळ व निवड प्रक्रियेची पुरेशी माहिती अनेक पालकांना देण्यात आली नसल्याने मोठ्या संख्येने पालक बैठकीस उपस्थित राहू शकले नाहीत. तसेच सर्व पालकांना विश्वासात न घेता निवड प्रक्रिया पूर्ण करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. यामुळे संबंधित निवड अमान्य करून ती रद्द करण्यात यावी आणि सर्व पालकांच्या उपस्थितीत मतदान पद्धतीने शालेय समितीची फेरनिवडणूक घेण्यात यावी, अशी मागणी पालकांनी केली आहे. या निवेदनाच्या प्रती जिल्हा शिक्षण अधिकारी  (प्राथमिक), जालना तसेच तालुका शिक्षण अधिकारी, परतूर यांनाही पाठविण्यात आल्या असून प्रशासन याबाबत काय निर्णय घेते, याकडे पालकांचे लक्ष लागले आहे.     या न...

नांदेडच्या ऐतिहासिक धम्म सोहळ्याचे साक्षीदार व्हा - राहुल नाटकर

परतूर / (प्रतिनिधी) कैलाश चव्हाण
दिल्ली मध्ये मध्यतंरी धम्म दिक्षेचा सोहळा पार पडला.त्या मध्ये २२ प्रतिज्ञाचे वाचन करण्यात आले.या २२ प्रतिज्ञावरुन देशभरात वादळ माजतय अशी परिस्थिती आहे. वैदीक हींदु संघटना व त्याचे प्रतिनिधींची २२ प्रतिज्ञावर बंदी आणावी अशी भुमीका आहे. गुजरातच्या निवडणुका होई पर्यंत बंदी येणार नाही.परंतू गुजरातच्या निवडणुकि संंपल्या की बंदी येण्याची शक्यता आहे. या दृष्टीने विचार करता भारतीय बौद्ध महासभेच्या वतीने नांदेड येथे ५ नोव्हेबंरला धम्म अधिवेशन आयोजीत करण्यात आले आहे. 
      सर्व आबेडकरवादी आणी ज्यांनी ज्यांनी दिक्षा सामारोह पार पाडलेला आहे.त्यांनी लाखोच्या संख्खेने उपस्थित राहणे क्रम प्राप्त आहे. असे जाहीर आव्हान परतूर शहर अध्यक्ष राहुल नाटकर सह रविंद्र भदर्गे, रोहण वाघमारे , बाबु गोस्वावी आशोक ठोके, लिंबाजी कदम प्रदीप साळवे,दीपक हिवाळे आकाश मुंढे व आदी कार्यकर्त्योनी दिलेल्या प्रसिध्दी पञकाद्वारे केले आहे.

Comments

Popular posts from this blog

आपुला तो एक देव करुनी घ्यावा*-ह.भ प पूरूषोत्तम महाराज

भगवत भक्ती शिवाय मनुष्याला सुखाची प्राप्ती होणार नाही, बेलोरा येथ तीन दिवसीय श्री गीता रामायण संत्संग व ज्ञानयज्ञ सोहळ्यात प पू . आनंद चैतन्य बापू यांचे प्रतिपादन

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई जालना शहरातील घरफोडीत सराईत आरोपी जेरबंद करून तीन तोळे वजनाचे सोन्याचे गंठण केले हस्तगत