स्वार्थ व गर्वा पाई जिल्ह्यातील क्रिकेट खेळांडूंच भविष्य अंधारात.

जालना प्रतिनिधी समाधान खरात 
    जालना जिल्ह्यातील विजय झोल, मिना गुरवे, आघाव आदी क्रिकेट खेळाडी महाराष्ट्राचे प्रतिनिधीत्व केलेले असल्या मुळे क्रिकेट या खेळा कडे अनेक पालकांचा कल आहे.
या सर्वांचा आदर्श डोळ्यासमोर ठेऊन जिल्ह्यातील अनेक खेळाडू सद्या क्रिकेट चा सराव करताना दिसतात.
    प्रत्येक पालक क्रिकेट शिकवण्या करिता अगदी मुलगा-मुलगी ५-६ वर्षाचे झाले की, आपल्या पाल्याला चांगला प्रशिक्षक शोधून क्रिकेट करिता ते सांगतील त्या महागातल्या महाग वस्तू घेतात. क्रिकेट चा सराव सुरू राहतो, दिवसेनं दिवस आपल्या पाल्यात सुधारणा पाहून पालक आनंदात असतात.
  मुलगा १४ वर्षाचा होईपर्यंत प्रशिक्षकाची फिस जी १०-१२ हजार असते ती दर वर्षाला भरत असतात. परत दर रविवारी किंवा सुट्यांमध्ये मॅचेस असतात त्या सामण्यांची फिस भरतात. का तर आपला मुलगा-मुलगी ही भविष्यात महाराष्ट्र व नंतर भारताचे प्रतिनिधीत्व करेल. या भाबड्या आशेपोटी हा सगळा खटाटोप सुरू असतो. मुलं मुली नियमित चांगले खेळले तर ते प्रतिनिधीत्व करतात.
   पण गेली अनेक वर्षे जालना जिल्ह्यातील जालना क्रिकेट असोसिएशन हे ठरावीक लोकं चालवताना दिसते. त्यामुळे अंतर जिल्हा क्रिकेट सामने असो की, महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन ची १४,१६ किवा १९ वर्षाखालील निवड प्रक्रिया असो याची कुठेही जाहीरात दिली जात नाही. या उलट आपल्या मर्जीतील पालकांच्या मुलांना संधी देली जाते. एखादा खेळाडू चा असला तरी वाइट हेतू ने त्याला डावलले जाते. तसेच निवड प्रक्रियेच्या नावाखाली पालकांकडून अव्वाच्या-सव्वा पैसे वसुल केल्या जातात. पालकांना त्याची पावती दिली जात नाही. हा सर्व भोंगळा कारभार सुरू आहे. 
     म्हणून जालना जिल्ह्यातील ऊदयोन्मुख क्रिकेट खेळाडूंचे भविष्य अंधारात राहू नेये या करिता
जालना क्रिकेट असोसिएशन च्या कारभाराची चौकशी व्हावी. या करिता परतूर येथे पत्रकार परिषद घेऊन शर्मा क्रिकेट असोसिएशन परतूर चे प्रशिक्षक संतोष शर्मा यांच्या वतीने करण्यात आली आहे.

Popular posts from this blog

तळणी येथील दोन गरजूंना ग्रा. सदस्य पांंडूरंग अण्णा जनकवार व सरपंच गौतम सदावर्ते यांच्या कदून मदत

परतूर येथून चोरीला गेलेला अयशरचा पोलिसांनी लावला गुन्ह्याचा छडा, परतूर पोलिसांचा तपासाला आले यश ८१ किंट्टल ६५ किलो कापूस, आठ लाख रुपये किमतीचा अयशर चोरट्यांनी पळविला होता.

अमृत भारत स्टेशन पुनर्विकास योजनेद्वारे परतुर रेल्वे स्थानकाचा कायापालट होणार, परतुर स्थानकाच्या पुनर्विकासासाठी केंद्र सरकारतर्फे २२ कोटी ०८ लाख रुपयांचा निधी - आमदार बबनराव लोणीकर यांचे प्रतिपादन, पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या शुभहस्ते ई-भूमिपूजन सोहळा संपन्न, मराठवाड्यातील ०९ स्थानकांच्या पुनर्विकास कार्यक्रम अंतर्गत छत्रपती संभाजीनगर नंतर परतूर येथे सर्वाधिक उपस्थिती